शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्यांच्या प्रमाणात रुग्णसंख्या होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : लवकर निदान व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : लवकर निदान व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचे काहीसे दिलासादायक चित्र समोर येत आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा सरासरी ४०० ते ५०० दरम्यान होता. मात्र, त्यावेळी चाचण्यांची संख्या कमी असल्याने पॉझिटिव्हिटी दर १६ ते २२ टक्क्यांपर्यंत होता. मे महिन्यात चाचण्यांची संख्या वाढली असली, तरी दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास स्थिर असल्याने पॉझिटिव्हिटी दर १३ ते १५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे.

............................

ग्रामीण भागातही टेस्टिंग वाढले!

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष शिबिर घेऊन चाचण्या करण्यात येत आहेत.

गर्दीच्या ठिकाणी तसेच चेकपोस्ट येथेही कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. चाचण्यांची संख्या वाढविली असली, तरी रुग्णसंख्या स्थिर असल्याने कोरोनाबाधितांच्या टक्केवारीच्या प्रमाणात घट येत असल्याचे दिसून येते.

सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसून येताच आजार न लपविता तातडीने चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.

..........................

---------------------

शहरातील चाचण्या, रुग्ण व पॉझिटिव्हिटी दर

तारीख चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी दर

१ एप्रिल १८५१ ३०१ १६.२६

८ एप्रिल २१६८ १९६ ०९.०४

१५ एप्रिल २५८१ ५६९ २२.०४

२१ एप्रिल २०१७ ३८७ १९.१८

२८ एप्रिल २८२२ ५२४ १८.५६

१ मे ३५६९ ६८० १९.०५

२ मे २५८६ ४२४ १६.३९

३ मे ३६४९ ५८२ १५.९४

४ मे ३२६६ ४४७ १३.६८

-----------------

‘आरटीपीसीआर’चे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग झाला आहे का हे तपासणीसाठी ७० टक्के चाचण्या या ‘आरटीपीसीआर’व्दारे, तर ३० टक्के चाचण्या या अ‍ॅन्टिजेन रॅपिडव्दारे करण्यात येत आहेत. ‘आरटीपीसीआर’व्दारे करण्यात येणारी कोरोना चाचणी ही अ‍ॅन्टिजेन चाचणीच्या तुलनेत अधिक अचूक असते; तर अ‍ॅन्टिजेनमध्ये अचूकतेचे प्रमाण हे ५० ते ६० टक्केच आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह अहवाल आला, तर त्या रुग्णास पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी करण्यास सांगण्यात येते. अनेकवेळा रुग्ण थेट रुग्णालयात दाखल होतात. त्यावेळी तात्काळ चाचणी करून, अहवाल प्राप्तीसाठी अ‍ॅन्टिजेन रॅपिड टेस्ट उपयोगी पडते. परंतु, काही वेळेत लक्षणे असूनही अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह येत असतो, त्यामुळे अशा रुग्णांची पुन्हा ‘आरटीपीसीआर’व्दारे चाचणी घेण्यात येते.

.............

कोट

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याचे तुर्तास तरी दिसून येत आहे. नागरिकांनीदेखील अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.

- डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.