शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

By admin | Updated: March 21, 2016 01:49 IST

जामदरा येथील शेतक-यांनंतर खंडाळा येथील शेतकरीही आंदोलनाच्या पवित्र्यात.

मनोहर राठोड /चौसाळा(जि. वाशिम)गत तीन वर्षांंपासून दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आता परिस्थितीपुढे हतबल होत असल्याचे दिसून येते. याच हतबलतेतून मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.विविध कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने आणि शासन-प्रशासनाचा डोक्यावर हात नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत गुंतवणूक केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने, हताश होत शेतकरी खरीप हंगामात पेरणी न करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपत आहेत. १५ दिवसांपूर्वीच मानोरा तालुक्यातील जामदरा गावाने येत्या खरीप हंगामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता मानोरा तालुक्यातीलच खंडाळाच्या पारधी तांडा येथील ७५ टक्के शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या दुष्काळावर राजकीय नेतेमंडळी केवळ राजकारणच करीत आहे. शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. राजकीय नेत्यांकडून शेतकर्‍यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या मानोरा तालुक्यातील खंडाळा पारधी तांडा येथील शेतकर्‍यांनी पेरणी न करता जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्यमाय जेवू घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाहीह्ण अशा दुहेरी विवंचनेत अडकलेला शेतकरी आजमितीला मरणाच्या दारात उभा आहे. निसर्गाच्या अस्मानी, तर शासनाच्या सुल्तानी संकटाने शेतकर्‍याला हतबल केले आहे. निसर्गाचा लहरीपणा, पाचवीला पुजलेला दुष्काळ, त्यातूनच जन्मलेली नापिकी, उभा झालेला कर्जाचा डोंगर यामुळे जगण्याची उमेद राहिली नसल्याची मानसिकता शेतकर्‍यांची बनत चालली आहे, असे खंडाळा येथील शेतकर्‍यांचे मत आहे.