शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

By admin | Updated: March 21, 2016 01:49 IST

जामदरा येथील शेतक-यांनंतर खंडाळा येथील शेतकरीही आंदोलनाच्या पवित्र्यात.

मनोहर राठोड /चौसाळा(जि. वाशिम)गत तीन वर्षांंपासून दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आता परिस्थितीपुढे हतबल होत असल्याचे दिसून येते. याच हतबलतेतून मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.विविध कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने आणि शासन-प्रशासनाचा डोक्यावर हात नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत गुंतवणूक केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने, हताश होत शेतकरी खरीप हंगामात पेरणी न करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपत आहेत. १५ दिवसांपूर्वीच मानोरा तालुक्यातील जामदरा गावाने येत्या खरीप हंगामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता मानोरा तालुक्यातीलच खंडाळाच्या पारधी तांडा येथील ७५ टक्के शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या दुष्काळावर राजकीय नेतेमंडळी केवळ राजकारणच करीत आहे. शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. राजकीय नेत्यांकडून शेतकर्‍यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या मानोरा तालुक्यातील खंडाळा पारधी तांडा येथील शेतकर्‍यांनी पेरणी न करता जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्यमाय जेवू घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाहीह्ण अशा दुहेरी विवंचनेत अडकलेला शेतकरी आजमितीला मरणाच्या दारात उभा आहे. निसर्गाच्या अस्मानी, तर शासनाच्या सुल्तानी संकटाने शेतकर्‍याला हतबल केले आहे. निसर्गाचा लहरीपणा, पाचवीला पुजलेला दुष्काळ, त्यातूनच जन्मलेली नापिकी, उभा झालेला कर्जाचा डोंगर यामुळे जगण्याची उमेद राहिली नसल्याची मानसिकता शेतकर्‍यांची बनत चालली आहे, असे खंडाळा येथील शेतकर्‍यांचे मत आहे.