शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता आव्हान बंडखोरी शमविण्याचे

By admin | Updated: September 29, 2014 02:26 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात बंडखोरी.

विवेक चांदुरकर / वाशिमजिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात बंडखोरी झाली असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत पक्षांपुढे बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तसेच पक्षबदलही झाले आहेत. निवडणुकीत अनेक उमेदवार केवळ पैसे कमविण्यासाठीही अर्ज दाखल करतात. त्यामुळे यामध्ये पैशांचा घोडाबाजार मोठय़ा प्रमाणात चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांची उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी युती व आघाडी तुटल्यामुळे अनेकांना आ पल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. उमेदवारी मिळविण्याकरिता नेत्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. मात्र, ऐनवेळेवर दुसर्‍या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक इच्छूकांना धक्का बसला व त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून पक्षाला हादरा देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकच पक्षात बंडखोरी झाली. जिल्ह्यात कारंजा म तदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश डहाके यांना डावलून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे डहाके यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसची उमेदवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांना मिळाली असून, माजी मंत्री तथा कारंजाचे माजी आमदार बाबासाहेब धाबेकर यांचा मुलगा सुनील धाबेकर यांनीही अपक्ष म्हणून कारंजातून उमेदवारी दाखल केली आहे. गतवेळी वाशिम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या माजी जिल्हाध्यक्ष अल्का मकासरे यांनी यावेळी पक्षाने माजी आमदार सुरेश इंगळे यांना उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. तसेच जिल्ह्यात काही पक्षबदलही झाले. वाशिममध्ये भाजपाचे सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ पली उमेदवारी दाखल केली. रिसोड विधानसभा मतदारसंघात मनसेतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून यामध्ये पती पत्नी विजयी झालेले विश्‍वनाथ सानप यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेतर्फे आपली उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी व्हावे, याकरिता सर्वच पक्ष आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बंडखोरांना शमवून त्यांना आपल्या बाजुने करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. यामध्ये मतदारसंघात अनेक घडामोडी घडणार आहेत.