शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लस घेणाऱ्या ५९७८ जणांपैकी एकालाही कोरोना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST

देशात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस विकसित झाल्यानंतर या लसीचे प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे ...

देशात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस विकसित झाल्यानंतर या लसीचे प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स मिळून १००६४ लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात ९ फेब्रुवारीपर्यंत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या ५३२४ लसीकरणाच्या उद्दिष्टापैकी ३६४५ लसीकरण झाले, तर ११ फेब्रुवारीपर्यंत एकूण १००६४ च्या उद्दिष्टापैकी ५९७८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. ठरलेल्या उद्दिष्टानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे दोन डोज दिले जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे रिअ‍ॅक्शन येते, कोरोनाची लागण होते, असा समज झाल्याने अनेकांनी प्रारंभी ही लस घेण्याचेही टाळले; परंतु हळूहळू हा समज दूर झाल्याने लस टोचून घेण्यास प्रतिसाद मिळू लागला. त्यात आजवर लस टोचून घेतलेल्या ५९७८ जणांपैकी एकालाही कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

-----------

५० जणांना मळमळ, उलट्या

जिल्ह्यात ५९७८ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. त्यापैकी एकालाही कोरोना संसर्ग झाला नाही. तथापि, लस घेतल्यानंतर ५० जणांना सुरुवातीचे तास, दोन तास मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवला. थोडी विश्रांती घेतल्यानंतर ५० जण पूर्वीप्रमाणे स्वस्थ झाले आणि कर्तव्यावर रुजूही झाले.

-----------

लस घेतल्यानंतर चार तास विश्रांती आवश्यक

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी ही लस घेतल्यानंतर अस्वस्थ वाटणे, मळमळ, उलट्या होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान चार तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

कोट: जिल्ह्यात आजवर ५९७८ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. या लसीमुळे कोणालाही कोरोना संसर्ग झाला नाही किंवा दुष्परिणामही जाणवले नाही. काही लोकांना मळमळीचा किरकोळ त्रास झाला; परंतु ते सर्व स्वस्थ आहेत.

-अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम