शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

नीता लांडे यांनी घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

नीता लांडे यांचा जन्म कारंजातीलच धनज बु. येथे झाला. नववीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरविल्यानंतर त्यांच्या आईने काबाडकष्ट करून दोन ...

नीता लांडे यांचा जन्म कारंजातीलच धनज बु. येथे झाला. नववीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरविल्यानंतर त्यांच्या आईने काबाडकष्ट करून दोन मुली आणि एका मुलाचा सांभाळ केला. त्यातूनच नीता लांडे यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी शेतात राबून शिक्षण घेतले. कारंजा तालुक्यातील तपोवन हे त्यांचे सासर. त्यांना पूर्वीपासूनच पर्यावरणाची आवड होती. लग्नानंतर त्यांना पुण्याला जावे लागले; परंतु पर्यावरणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्या पती आणि तीन मुलांसह पुन्हा तपोवन येथे आल्या. परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी मिळेल ते काम करतानाच पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. त्यातून त्यांनी कारंजात जवळपास तीन हजार झाडे लावली. त्यांचे कार्य पाहून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने त्यांना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदाने सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात गावागावात जाऊन या संस्थेशी अनेक महिलांना जोडत पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम, वसुंधरा अभियान राबविले. त्यामुळे त्यांना वृक्षमित्र पुरस्कार, ग्राहक पंचायतचा हिरकणी पुरस्कार, राज्य शासनाचे वसुंधरा मित्र प्रमाणपत्र, असे पुरस्कार मिळाले.