शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:24 IST

महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविली जाते. गरीब व वंचितांसाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेमध्ये वधू-वरांना प्रति जोडपे दहा हजार रुपये व विवाह सोहळा आयोजक संस्थेस दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत खोटा प्रस्ताव सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या देवळी (जि. अकोला) येथील रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देशुभमंगल योजनेच्या अनुदानासाठी खोटा प्रस्ताव शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविली जाते. गरीब व वंचितांसाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेमध्ये वधू-वरांना प्रति जोडपे दहा हजार रुपये व विवाह सोहळा आयोजक संस्थेस दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत खोटा प्रस्ताव सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या देवळी (जि. अकोला) येथील रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी कळविले आहे.रिहाई बहूद्देशीय संस्थेच्यावतीने कामरगाव (ता. कारंजा) येथे २४ जानेवारी २0१६ रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचे सांगून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावातील लाभार्थींच्या दस्तऐवजाबाबत शंका निर्माण झाल्याने महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांनी प्रस्तावातील लाभार्थींच्या गृह चौकशीचे आदेश दिले. या चौकशीअंती सदर संस्थेद्वारे आयोजित सामूहिक विवाह मेळाव्यातील लाभार्थींचे खोटे दस्तावज सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये रिहाई बहूद्देशीय संस्था अध्यक्ष सागर दामोदर सदाशिवविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१ अन्वये १६ ऑगस्ट २0१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही संस्था काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे राठोड यांनी कळविले आहे.शासनाच्या शुभमंगल सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत यापुढे ज्या संस्थांना सामूहिक विवाह आयोजित करावयाचे आहेत, त्यांनी जोडप्यांची शहानिशा करूनच प्रस्ताव दाखल करावा. अन्यथा जोडप्यांचे दस्तावेज खोटे आढळल्यास संस्थेला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच यापुढे स्वत: जोडप्यांनी पुढे येऊन विवाह नोंदणीचे सहायक निबंधक यांच्याकडे विवाह नोंदणी करून अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. सर्वसाधारण, इतर मागास प्रवर्गातील विधवा महिलेच्या मुलींच्या विवाहाकरिता व नोंदणीकृत विवाहांनासुद्धा अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली