साहेबराव राठोड / मंगरूळपीरवाशिम विधानसभा मतदार संघातील मंगरूळपीर तालुक्याला एकाही पक्षाने उमेदवारी न दिल्याने म तदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.बहुरंगी होणार्या निवडणुकीत या प्रकारामुळे तालुक्यातील म तदारांचा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी देण्यात वाशिम तालु क्यालाच झुकते माप दिल्यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील विविध पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडण्याची चिन्हे पहावयास मिळत आहेत.२00९ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा मंगरूळपीर तालुक्याला उमेदवारी पासून वंचित ठेवण्यात आले होते.या निवडणुकीत तालुक्यातील इच्छुकांचा विचार होईल असे वाटत होते.आघाडीत बिघाडी,महायुतीला खिंडार पडल्यावर तालुक्याला न्याय मिळेल अशी आशा होती ती आशा राजकीय पक्षांनी धुळीस मिळवली. सर्वच पक्षाचे उमेदवार या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत.तालुक्यातून एखादय़ा पक्षाने उमेदवारी देण्याची तसदी दाखवली असती तर तालुक्यास न्याय मिळाला असता व त्या उमेदवारास पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची संधी मिळाली असती असा सूर मतदारामध्ये व्यक्त केला जात आहे.तालुक्यातून कोणालाच पक्षाची उमेदवारी मिळालेली नसल्याने म तदार संभ्रमात आहेत. मागील ५ वर्षाच्या काळात तालुक्याचा विकास शून्य राहिला त्यामुळे मतदारांनी रोष व्यक्त करणे सुरू केले आहे.
मंगरूळपीर तालुक्याची राजकीय पक्षांकडून उपेक्षा
By admin | Updated: October 2, 2014 01:08 IST