शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

महिलांना सक्षम करणाऱ्या वर्धिनींची उपेक्षा थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

वाशिम : ग्रामीण भागात महिला बचत गटांची निर्मिती आणि त्यांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांसाठी सज्ज करणाऱ्या राज्यभरातील उमेद अभियानांतर्गत नेमणूक ...

वाशिम : ग्रामीण भागात महिला बचत गटांची निर्मिती आणि त्यांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांसाठी सज्ज करणाऱ्या राज्यभरातील उमेद अभियानांतर्गत नेमणूक मिळालेल्या वर्धिनींना कोरोना संकटाचा जबर फटका बसला. तुटपुंज्या मानधनावर गावोगावी भटकून सेवा देत असताना राज्यातील सुमारे २९०० वर्धिनींना गेल्या वर्षभरापासून बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील शंभरावर वर्धिनींचा समावेश आहे. आज ना उद्या पुन्हा कामावर घेतले जाईल, या अपेक्षेने या महिला गरज पडेल तेव्हा मोफत सेवा देत आहेत, हे विशेष.

राज्यात ‘उमेद’ अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात २०११ मध्ये झाली. याअंतर्गत विशेषत: ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून त्यांना उपजीविकेच्या संधी निर्माण करून देण्याचा उद्देश बाळगण्यात आला. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशू सखी, ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी आदी विभाग निर्माण करून त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन बचत गट निर्माण केले. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन करण्यासह ग्रामसंघ, प्रभाग संघ व उत्पादक गट तयार करून बचत गटांना कर्ज मिळवून देण्यासह उत्पादित मालास राज्य, केंद्र स्तरावर बाजारपेठ मिळवून दिली. या कंत्राटी मनुष्यबळाच्या जोरावरच राज्यात पाच लाखांपेक्षा अधिक समूह, २० हजारांवर ग्रामसंघ, ८०० च्या आसपास प्रभागसंघ स्थापन होऊ शकले.

असे असताना उमेद अभियानाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतापलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींसह इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलने केली. त्यामुळे संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले; मात्र खेडेगावात बचत गट स्थापनेविषयी प्रभावी जनजागृती करण्यासह महिलांचा बचत गटांमध्ये सहभाग निश्चित करणे, त्यांना बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणाऱ्या वर्धिनींना अद्याप कामे उपलब्ध करून देण्याचा कुठलाच विचार झालेला नाही.

..................

कोट :

कोरोनाच्या संकटामुळे काम पूर्णत: थांबले आहे. यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मानधनही मिळालेले नाही. आता लवकरच ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे ‘राऊंड’ सुरू होतील, असे वरिष्ठांकडून कळविण्यात आले. असे झाल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे शक्य होईल.

- लक्ष्मी शेळके, वर्धिनी, मालेगाव.