शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 5, 2016 03:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; दुष्काळाची केली पाहणी.

मेडशी (रिसोड, जि. वाशिम) : सतत तीन वर्षांंपासून असलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शेतकर्‍यांच्या समस्यांशी शासनाला काहीही घेणे-देणे नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करताना केला. सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशा बिकट परिस्थितीतदेखील सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. कृषी मंत्र्यांवर हल्ला चढवित ते म्हणाले, की सरकारने गोहत्या बंदी केली ते चांगले झाले; मात्र गोवंश हत्याबंदीमुळे शेतकर्‍यांना आपली जनावरे विकता येत नाही. जनावरांना, शेतकर्‍यांना जगविणे सरकारची जबाबदारी असताना सरकार उद्योगपतींना जगवित आहे. हे सरकार उद्योगपती अंबानी, अदानी यांना जगवित आहे. शेतकर्‍यांचे १३ कोटीचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची ६५ हजार कोटींची कर्जे माफ होतात. मेक इन महाराष्ट्रामध्ये मेडशी आहे का, वाशिम जिल्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला. आदिवासी ग्राम कोळदरा व वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी मेडशी व परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख आदींची उपस्थिती होती.