शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 5, 2016 03:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; दुष्काळाची केली पाहणी.

मेडशी (रिसोड, जि. वाशिम) : सतत तीन वर्षांंपासून असलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शेतकर्‍यांच्या समस्यांशी शासनाला काहीही घेणे-देणे नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करताना केला. सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशा बिकट परिस्थितीतदेखील सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. कृषी मंत्र्यांवर हल्ला चढवित ते म्हणाले, की सरकारने गोहत्या बंदी केली ते चांगले झाले; मात्र गोवंश हत्याबंदीमुळे शेतकर्‍यांना आपली जनावरे विकता येत नाही. जनावरांना, शेतकर्‍यांना जगविणे सरकारची जबाबदारी असताना सरकार उद्योगपतींना जगवित आहे. हे सरकार उद्योगपती अंबानी, अदानी यांना जगवित आहे. शेतकर्‍यांचे १३ कोटीचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची ६५ हजार कोटींची कर्जे माफ होतात. मेक इन महाराष्ट्रामध्ये मेडशी आहे का, वाशिम जिल्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला. आदिवासी ग्राम कोळदरा व वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी मेडशी व परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख आदींची उपस्थिती होती.