शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 5, 2016 03:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; दुष्काळाची केली पाहणी.

मेडशी (रिसोड, जि. वाशिम) : सतत तीन वर्षांंपासून असलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शेतकर्‍यांच्या समस्यांशी शासनाला काहीही घेणे-देणे नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करताना केला. सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशा बिकट परिस्थितीतदेखील सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. कृषी मंत्र्यांवर हल्ला चढवित ते म्हणाले, की सरकारने गोहत्या बंदी केली ते चांगले झाले; मात्र गोवंश हत्याबंदीमुळे शेतकर्‍यांना आपली जनावरे विकता येत नाही. जनावरांना, शेतकर्‍यांना जगविणे सरकारची जबाबदारी असताना सरकार उद्योगपतींना जगवित आहे. हे सरकार उद्योगपती अंबानी, अदानी यांना जगवित आहे. शेतकर्‍यांचे १३ कोटीचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची ६५ हजार कोटींची कर्जे माफ होतात. मेक इन महाराष्ट्रामध्ये मेडशी आहे का, वाशिम जिल्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला. आदिवासी ग्राम कोळदरा व वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी मेडशी व परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख आदींची उपस्थिती होती.