शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

गरज १४0९ हेक्टरची; जमीन मिळाली केवळ २.७८ हेक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:20 IST

वाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकर्‍यांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकर्‍यांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलैपासून सुरू झालेली भूसंपादन प्रक्रिया केवळ पाच शेतकर्‍यांच्या (२ हेक्टर २७ आर) भूसंपादनाचा अपवाद वगळल्यास पुढे सरकू शकली नाही. 

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग निर्मितीमधील अडथळे दूर होईना शेतकर्‍यांचा विरोध कायम

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकर्‍यांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकर्‍यांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलैपासून सुरू झालेली भूसंपादन प्रक्रिया केवळ पाच शेतकर्‍यांच्या (२ हेक्टर २७ आर) भूसंपादनाचा अपवाद वगळल्यास पुढे सरकू शकली नाही. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या नागपूर-मुंबई या ७१0 किलोमिटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जाणार्‍या या महामार्गासाठी १४0९ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी पुर्वी शासनाने शेतकर्‍यांसमोर भू-संपादन आणि भू-संचय, असे दोन पर्याय ठेवले होते. त्यापैकी भू-संचय पद्धत शेतकर्‍यांच्या हिताची ठरणार असल्याचा मुद्दा समोर करत शासनाने विविध स्वरूपातील फायदे जाहीर करून शेतकर्‍यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास संबंधित शेतकर्‍यांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भू-संचय पद्धतीने जमिनी घेण्याचा विचार सोडून देत २२ जुलैपासून केवळ भू-संपादनाच्या माध्यमातून जमिनी घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. बाजारभावाच्या पाच पट अधिक मोबदला देवून २२ जुलैला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर जबाबदार अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पाच शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, हा अपवाद वगळता कुठल्याच शेतकर्‍याची जमीन संपादित करण्यात आलेली नाही. या प्रक्रियेसही शेतकर्‍यांमधून तीव्र विरोध दर्शविला जात असल्यानेच ही स्थिती उद्भवली असून २९ जुलै रोजी वनोजा (ता.मंगरूळपीर) येथे झालेल्या समृद्धी महामार्ग संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत या महामार्गासाठी एक एकरही जमिन न देण्याची शपथ शेतकर्‍यांमधून घेण्यात आली आहे. यामुळे मात्र शासनाची डोकेदुखी वाढली असून महामार्ग निर्मिती प्रक्रियेलाही अनपेक्षित ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे.