शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा बुडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:23 IST

मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.

ठळक मुद्देकोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्तारात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.भारत मुक्ती मोर्चाचे कार्य करण्यापूर्वी ते ८ वर्षे भारिप-बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष होते. ते दररोज कोल्ही तलावात पोहण्यासाठी जात होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ते पोहण्यासाठी तालावावर गेले. त्यांच्यासोबत पोलीस पाटील काशिनाथ काटेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे, प्रल्हाद बुंदे आदी मित्र होते. तलावावर त्यांनी मित्रांना सांगितले की, आज त्यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे ते पोहण्याऐवजी काठावर बसून आंघोळ करणार आहेत. त्यामुळे बाकीचे पोहण्यासाठी तलावात गेले. परत आले तर त्यांना पखाले तिथे दिसले नाहीत. त्यांनी घटनेची माहिती पखाले यांच्या नातेवाइकांना, पोलिसांना व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक दुपारी २ वाजता साहित्यासह घटनास्थळी आले; मात्र मनुष्यबळ नसल्याने कुणीही पाहणी करू शकले नव्हते. महान येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर सदर पथकाने सायंकाळी ५ वाजतापासून शोध कार्य हाती घेतले. अंधार पडल्यामुळे रात्री ७.१५ वाजता शोध कार्य थांबविण्यात आले. तोपर्यंत पखाले यांचा शोध लागला नव्हता. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजतापासून महानचे पथक शोध कार्य सुरू करणार आहे.-