शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी विजेचे नियोजन करताना महावितरणची दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 13:48 IST

वाशिम: आगामी रब्बी हंगामात उपलब्ध जलस्त्रोतांव्दारे शेतकºयांकडून कृषीपंपांव्दारे सिंचन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी वीज आवश्यक ठरणार असून त्याचे नियोजन करताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे विरोधी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या विरोधामुळे कृषीपंपांची ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी वसूल करणे ...

ठळक मुद्देकृषीपंपाच्या देयक वसूलीत विरोधकांचा खोडा नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न ऐरणीवर

वाशिम: आगामी रब्बी हंगामात उपलब्ध जलस्त्रोतांव्दारे शेतकºयांकडून कृषीपंपांव्दारे सिंचन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी वीज आवश्यक ठरणार असून त्याचे नियोजन करताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे विरोधी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या विरोधामुळे कृषीपंपांची ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी वसूल करणे अशक्य ठरत असल्याने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: हैराण झाले आहेत. 

वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकºयांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफुल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होते. यंदा मात्र स्थिती चिंताजनक असून पर्जन्यमान घटल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यातुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने घरगुती, वाणिज्यिक, व्यावसायिक, पाणीपुरवठा योजना या घटकांना वीज पुरवून कृषीपंपांनाही वीज पुरविण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. यात अधिकारी, कर्मचाºयांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती