शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

महावितरणने गोळा केले ४७ हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक

By admin | Updated: July 6, 2017 01:16 IST

कर्मचाऱ्यांचे यशस्वी प्रयत्न : विजेसंदर्भातील माहिती मिळणार ‘मोबाइल’वर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महावितरणने जवळपास सर्वच ग्राहक सेवा ‘आॅनलाईन’ उपलब्ध केल्या असून त्या ग्राहकांना सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘महावितरण’च्याच माहिती व तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणारे चार मोबाईल अ‍ॅप देखील विकसित केले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विद्यूत ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून ५ जुलैपर्यंत २ लाख २० हजार २६४ ग्राहकांपैकी ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल क्रमांक गोळा झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.महावितरणने विकसीत केलेल्या विविध स्वरूपातील मोबाईल अ‍ॅपव्दारे वीजबिल पाहणे, ते आॅनलाईन भरणे यासह इतरही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बिल भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली अथवा नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेली आहे. ज्या ग्राहकांचे रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश पाठविला जाईल. त्यानंतर ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदविण्याची सोय त्यात असणार आहे. त्यानुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जनमित्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच गावांमधील ग्राहकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ४४७ ग्राहकांचे मोबाईल प्राप्त झाले असून इतर ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले मोबाईल नंबर महावितरणला देवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी केले आहे.