शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

शासनाच्या विरोधात प्रत्येक जिल्हय़ात होणार आंदोलन!

By admin | Updated: February 10, 2016 02:11 IST

हरिभाऊ राठोड यांचा इशारा; वाशिम जिल्ह्यात २२ फेब्रुवारीला आंदोलन

वाशिम : राज्यात भटक्या विमुक्तांची लोकसंख्या २.५0 कोटीच्या जवळपास आहे. सरकार भटक्या आणि विमुक्तांच्या कल्याणकारी योजना बंद करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आ. हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या विरोधात मुंबई येथे २३ फेब्रुवारी २0१६ रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हय़ात १५ फेब्रुवारी नांदेड, १८ फेब्रुवारी वाशिम, २२ फेब्रुवारी लातूर, ५ मार्च बीड, १९ मार्च हिंगोली, २0 मार्च इंदापूर, २२ मार्च कन्नड महाराष्ट्रभर या पंधरवड्यात आंदोलने होणार आहेत. भटक्या विमुक्तांच्या समस्यांवर बैठक लावण्याच्या संदर्भात राज्यमंत्री संजय राठोड, आमदार हरिभाऊ राठोड तसेच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी वारंवार आग्रह करुन मुख्यमंत्री यांना बैठक लावण्याची विनंती केली; मात्र हे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकदाही बैठक झाली नाही. गेल्या दीड वर्षात ३ वेळा बैठक लावण्यात आली आणि ती वेळेवर रद्द करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत सहय़ाद्री गेस्ट हाऊस येथे दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते; परंतु बंजारा आणि भटक्या विमुक्तांचे निमंत्रित कार्यक्रम आणि आमदार व मंत्री पंकजा मुंडे हजर असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अनास्थेमुळे बैठक रद्द करण्यात आली. तेही कोणतेही कारण न देता बैठक रद्द झाली. पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, या विषयावर मात्र बैठक झाली; परंतु स्थानिक माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या भूमिकेमुळे पोहरादेवी विकासाच्या आराखड्याला खो घालण्यात आला. माजी केंद्रिय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पोहरादेवीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आणि त्यांच्या काळामध्ये मंजूर झालेले १0 कोटींपैकी ५.५0 कोटी अजूनही खर्च न झाल्यामुळे तोही निधी शासन परत करण्याच्या विचारात आहे. एकीकडे बंजारा समाजाची हेळसांड थांबत नाही आणि भटक्या विमुक्तांबद्दल मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांची अनास्था पाहून भाजप दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आ. हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे.