शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

सर्वदूर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:42 IST

वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 

ठळक मुद्देपैनगंगा नदीवरील बॅरेजेस तुडुंब तूर, कपाशीसह हळदीच्या पिकाला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. गत चार-पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. तीन-चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही काही भागात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. गुरुवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने गत आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. वाशिम शहरासह मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मालेगाव व वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस होता. शुक्रवारी वाशिम तालुक्यात संततधार झाल्याने ११ बॅरेजेस् तुडुंब भरली. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाच्या आशा पल्लवित होत आहेत. दुपारी १२ वाजतानंतर  पावसाचा जोर ओसरला. वादळवारा व विजांचा कडकडाट नसल्याने जिल्ह्यात कुठेही वित्त वा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा..वाशिम व परिसरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाटबंधारे विभागाने पैनगंगा नदी तिरावरील तसेच बॅरेज परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ११ बॅरेजेस्चे गेट परिचलन करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नदीकाठावरील नागरिकांना तसेच संबंधित गावांत दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा द्यावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली. वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, ढिल्ली, टणका, जयपूर या ११ बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी स्पष्ट केले.-