शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

सर्वदूर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:42 IST

वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 

ठळक मुद्देपैनगंगा नदीवरील बॅरेजेस तुडुंब तूर, कपाशीसह हळदीच्या पिकाला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. गत चार-पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. तीन-चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही काही भागात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. गुरुवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने गत आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. वाशिम शहरासह मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मालेगाव व वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस होता. शुक्रवारी वाशिम तालुक्यात संततधार झाल्याने ११ बॅरेजेस् तुडुंब भरली. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाच्या आशा पल्लवित होत आहेत. दुपारी १२ वाजतानंतर  पावसाचा जोर ओसरला. वादळवारा व विजांचा कडकडाट नसल्याने जिल्ह्यात कुठेही वित्त वा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा..वाशिम व परिसरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाटबंधारे विभागाने पैनगंगा नदी तिरावरील तसेच बॅरेज परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ११ बॅरेजेस्चे गेट परिचलन करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नदीकाठावरील नागरिकांना तसेच संबंधित गावांत दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा द्यावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली. वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, ढिल्ली, टणका, जयपूर या ११ बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी स्पष्ट केले.-