शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वदूर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:42 IST

वाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. 

ठळक मुद्देपैनगंगा नदीवरील बॅरेजेस तुडुंब तूर, कपाशीसह हळदीच्या पिकाला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांनाच बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपातील कपाशी आणि तुरीच्या पिकाला आधार मिळाला, तर दुसरीकडे उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांची मात्र थोडीफार धावपळ झाली. रिसोड व वाशिम तालुक्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् तुडुंब भरले. गत चार-पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. तीन-चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही काही भागात सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांचीच चिंता वाढली होती. गुरुवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने गत आठवडाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बर्‍याचअंशी दिलासा मिळाला. वाशिम शहरासह मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत मालेगाव व वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस होता. शुक्रवारी वाशिम तालुक्यात संततधार झाल्याने ११ बॅरेजेस् तुडुंब भरली. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाच्या आशा पल्लवित होत आहेत. दुपारी १२ वाजतानंतर  पावसाचा जोर ओसरला. वादळवारा व विजांचा कडकडाट नसल्याने जिल्ह्यात कुठेही वित्त वा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा..वाशिम व परिसरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेस् हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाटबंधारे विभागाने पैनगंगा नदी तिरावरील तसेच बॅरेज परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ११ बॅरेजेस्चे गेट परिचलन करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी नदीकाठावरील नागरिकांना तसेच संबंधित गावांत दवंडीद्वारे सावधानतेचा इशारा द्यावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली. वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, ढिल्ली, टणका, जयपूर या ११ बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे, असे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी स्पष्ट केले.-