शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सहा दिवसांपासून अर्ध्याहून अधिक वनोजा गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST

गत महिनाभरापासून वनोजा येथील शिवाजीनगरासह इतर भागातील वीज पुरवठा दिवसातून दहा ते पंधरा वेळा खंडित होत आहे. त्यातच गेल्या ...

गत महिनाभरापासून वनोजा येथील शिवाजीनगरासह इतर भागातील वीज पुरवठा दिवसातून दहा ते पंधरा वेळा खंडित होत आहे. त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसांत दोन रोहित्रे जोडूनही नेमका बिघाड लक्षात न आल्यामुळे शिवाजीनगरासह इतर प्रभाग अंधारातच असून, महावितरण कर्मचाऱ्यांची हलगर्जी व निष्क्रिय कारभारामुळे छोटे-मोठे उद्योग ठप्प होण्यासह जनजीवन विस्कळीत होत आहे. यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या महिलांना खूप त्रास सहन करावा लागत असून, वीज पुरवठ्यअभावी एका गर्भवती महिलेची मोबाइल बॅटरीचा आधार घेऊन प्रसूती करावी लागल्याची घटनाही येथे घडली आहे. त्यातच वनोजा हे गाव काटेपूर्णा अभयारण्यालगत असून, या ठिकाणी जंगली जनावरे व विषारी साप यांचा सतत वावर असतो. यामुळे रात्री अप्रिय घटनाही घडण्याची भीती आहे. अशी घटना घडल्यास याला महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून, येथील अनियमित वीज पुरवठ्याची समस्या तत्काळ न सोडविण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिले आहे. निवेदनावर वनोजा येथील असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदन देताना महादेव बेलखेडे, मयूर ठाकरे, अक्षय राऊत, सचिन राणे, संदीप गावंडे, आशिष राऊत, आकाश राऊत, ओम राऊत उपस्थित होते.

-------------

कोरोना लस निकामी होण्याची भीती

वनोजा येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आरोग्य केंद्रात साठवलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी निकामी होण्याची भीती आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कोरोनाची लस खराब होऊ नये म्हणून काही वेळेसाठी राजाकिन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवावी लागली होती.