शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल कसे यावरच अधिक भर !  -  एकनाथ डवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:45 IST

शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.

- दादाराव गायकवाडवाशिम: विविध संकटांमुळे शेतीपिकांना फटका बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. यातून मार्ग काढून शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. ते  एका कार्यक्रमानिमित्त वाशिम येथे आले असता. शेतकºयांच्या  समस्यांबाबत  घेतलेली त्यांची ही मुलाखत

शेतकºयांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी काय विशेष उपाय करणार ?शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालास अधिकाधिक दर मिळावेत म्हणून उत्पादन ते विक्री या दरम्यानची साखळी कमी करून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे प्रयत्न आहेत. बाजारात ज्या शेतमालास मागणी आहे. तेच शेतकºयांनी पिकवावे, यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठीच विकेल ते पिकेल, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  

विदर्भात कपाशीचे घटत असलेले क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणार का?शेतकरी जे परवडेल, तेच पीक घेतो. सोयाबीन पीक शेतकºयांना फायद्याचे वाटत आहे. त्यामुळे इतर पिकांवर भर देण्यापेक्षा याच पिकाचे उत्पादन कसे वाढेल आणि शेतकºयांना कसा फायदा होईल, यावर भर देणे महत्त्वाचे आहे. 

बियाणे न उगवल्याच्या प्रकारात कंपन्यावरील कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसते, असे  का ?यंदाच्या हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे न उगवल्याची विविध कारणे आहेत. त्यात अतिवृष्टी आणि पेरणीतील तांत्रिक दोषाचा समावेश असला तरी काही कंपन्यांचे बियाणेही निकृष्ट आढळले. त्यामुळेच ८० पेक्षा अधिक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाहणीतील निष्कर्षानुसारच कारवाई होत आहे.   

वाशिम जिल्ह्यात कोणत्या फळलागवडीवर भर देण्याचा प्रयत्न आहे.?पूर्वी सिंचन विहिरी असलेल्यांनाच फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळत होता. आता शेततळेधारकांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यात संत्रा लागवडीसाठी खूप वाव आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना या संदर्भात सुचना देऊन संत्रा पिकाचे क्षेत्र वाढविण्यास सांगण्यात येणार आहे. 

रब्बी हंगामाचे नियोजन काय ?राज्यात यंदा ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकºयांना लागणारे बियाणे, खते आदिंची उपलब्धता करण्यात येत असून, शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच कृषी विभागाचा अधिकाधिक भर राहणार आहे. कोणत्याही जिल्ह्यात खताचा तुटवडा भासू नये, म्हणून नियोजन करण्याच्या सुचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. 

पंचनाम्यांतील विलंबामुळे नुकसान कसे कळणार ?- प्रशासकीय यंत्रणा अतिवृष्टी आणि पीक नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीनेच करीत आहे. नुकसान झाले असेल, तर ते स्पष्ट होईल. शिवाय राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक कापणी प्रयोगातूनही शेतकºयांनी पेरलेल्या पिकांची स्थिती आणि त्यावर झालेला परिणाम दिसून येणार आहे. कोणाचे किती नुकसान झाले, तेसुद्धा त्या माध्यमातूून दिसून येणार आहे.   गतवर्षीच्या हंगामात घरगुती बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. वाशिम जिल्ह्यात घरगुती बियाण्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे, ही बाब चांगली आहे. इतरही जिल्ह्यात हा उपक्रम चागल्या प्रकारे राबविण्याच्या सुचना देण्यात येतील. शेवटी शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी खर्चात बचत करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तथापि, यासाठी शेतकºयांनी बीज प्र्रक्रिया करावी आणि १० वर्षांच्या आतील बियाणे वापरावे.  

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र