शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल कसे यावरच अधिक भर !  -  एकनाथ डवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:45 IST

शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.

- दादाराव गायकवाडवाशिम: विविध संकटांमुळे शेतीपिकांना फटका बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. यातून मार्ग काढून शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच भर देण्याचा प्रयत्न आहे, असे मत राज्याचे कृषीसचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. ते  एका कार्यक्रमानिमित्त वाशिम येथे आले असता. शेतकºयांच्या  समस्यांबाबत  घेतलेली त्यांची ही मुलाखत

शेतकºयांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी काय विशेष उपाय करणार ?शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालास अधिकाधिक दर मिळावेत म्हणून उत्पादन ते विक्री या दरम्यानची साखळी कमी करून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीचे प्रयत्न आहेत. बाजारात ज्या शेतमालास मागणी आहे. तेच शेतकºयांनी पिकवावे, यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठीच विकेल ते पिकेल, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  

विदर्भात कपाशीचे घटत असलेले क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणार का?शेतकरी जे परवडेल, तेच पीक घेतो. सोयाबीन पीक शेतकºयांना फायद्याचे वाटत आहे. त्यामुळे इतर पिकांवर भर देण्यापेक्षा याच पिकाचे उत्पादन कसे वाढेल आणि शेतकºयांना कसा फायदा होईल, यावर भर देणे महत्त्वाचे आहे. 

बियाणे न उगवल्याच्या प्रकारात कंपन्यावरील कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसते, असे  का ?यंदाच्या हंगामात शेतकºयांनी पेरलेले बियाणे न उगवल्याची विविध कारणे आहेत. त्यात अतिवृष्टी आणि पेरणीतील तांत्रिक दोषाचा समावेश असला तरी काही कंपन्यांचे बियाणेही निकृष्ट आढळले. त्यामुळेच ८० पेक्षा अधिक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाहणीतील निष्कर्षानुसारच कारवाई होत आहे.   

वाशिम जिल्ह्यात कोणत्या फळलागवडीवर भर देण्याचा प्रयत्न आहे.?पूर्वी सिंचन विहिरी असलेल्यांनाच फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळत होता. आता शेततळेधारकांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यात संत्रा लागवडीसाठी खूप वाव आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना या संदर्भात सुचना देऊन संत्रा पिकाचे क्षेत्र वाढविण्यास सांगण्यात येणार आहे. 

रब्बी हंगामाचे नियोजन काय ?राज्यात यंदा ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकºयांना लागणारे बियाणे, खते आदिंची उपलब्धता करण्यात येत असून, शेतकºयांचे उत्पादन कसे वाढेल, यावरच कृषी विभागाचा अधिकाधिक भर राहणार आहे. कोणत्याही जिल्ह्यात खताचा तुटवडा भासू नये, म्हणून नियोजन करण्याच्या सुचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. 

पंचनाम्यांतील विलंबामुळे नुकसान कसे कळणार ?- प्रशासकीय यंत्रणा अतिवृष्टी आणि पीक नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीनेच करीत आहे. नुकसान झाले असेल, तर ते स्पष्ट होईल. शिवाय राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक कापणी प्रयोगातूनही शेतकºयांनी पेरलेल्या पिकांची स्थिती आणि त्यावर झालेला परिणाम दिसून येणार आहे. कोणाचे किती नुकसान झाले, तेसुद्धा त्या माध्यमातूून दिसून येणार आहे.   गतवर्षीच्या हंगामात घरगुती बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. वाशिम जिल्ह्यात घरगुती बियाण्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे, ही बाब चांगली आहे. इतरही जिल्ह्यात हा उपक्रम चागल्या प्रकारे राबविण्याच्या सुचना देण्यात येतील. शेवटी शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी खर्चात बचत करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तथापि, यासाठी शेतकºयांनी बीज प्र्रक्रिया करावी आणि १० वर्षांच्या आतील बियाणे वापरावे.  

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र