शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहुर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांची धूम असते. मात्र, कोरोनामुळे लागू असलेल्या ...

वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांची धूम असते. मात्र, कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षीही अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला असून, लग्न समारंभ लांबणीवर पडले आहेत.

यंदा १४ मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. पण, यावर्षीही कोरोनाचे संकट आडवे आले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने याकाळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. मात्र, कडक निर्बंध असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहे तसेच लग्न सोहळ्याला केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी तसेच १५पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्यास संबंधितांविरूद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाईदेखील होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जाचक अटी यामुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकणार असून, लग्नसोहळे लॉकडाऊन झाल्याचे दिसून येते.

००००

मे महिन्यातील लग्न मुहूर्त

मे - १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २५, २६, २८, २९ आणि ३०

०००००

नियमांचा अडसर

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. लग्न समारंभासाठी परवानगी घेणे, केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी, मंगल कार्यालये बंद आदी नियमांमुळे लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. अनेकांनी लग्न समारंभ लांबणीवर टाकले आहेत.

०००

यंदा कर्तव्य नाही

कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध असल्यामुळे लग्न समारंभ कसा आयोजित करावा? हा पेच कायम आहे.

- तुकाराम पाटील, वरपिता

.......

लग्न समारंभावर अनेक मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचे संकट, १५ व्यक्तींची उपस्थिती, परवानगी घेणे आदी बाबींमुळे लग्न सोहळा लांबणीवर पडत आहे.

- अजाबराव चव्हाण, वधूपिता

००००

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. मार्च ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. शहरात १७ च्या आसपास मंगल कार्यालये आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर उपस्थितीचे बंधन घालून मंगल कार्यालयांना परवानगी देण्यात आली.

परंतु, मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने उपस्थितीची मर्यादा आणि दंडात्मक कारवाई यामुळे मंगल कार्यालये पुन्हा लॉकडाऊन झाली. मे महिन्यापासून कडक निर्बंध असल्याने मंगल कार्यालये कुलूपबंद आहेत. परिणामी, आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

०००००००००००००००००