शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहुर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांची धूम असते. मात्र, कोरोनामुळे लागू असलेल्या ...

वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांची धूम असते. मात्र, कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षीही अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला असून, लग्न समारंभ लांबणीवर पडले आहेत.

यंदा १४ मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. पण, यावर्षीही कोरोनाचे संकट आडवे आले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने याकाळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. मात्र, कडक निर्बंध असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहे तसेच लग्न सोहळ्याला केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी तसेच १५पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्यास संबंधितांविरूद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाईदेखील होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जाचक अटी यामुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकणार असून, लग्नसोहळे लॉकडाऊन झाल्याचे दिसून येते.

००००

मे महिन्यातील लग्न मुहूर्त

मे - १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २५, २६, २८, २९ आणि ३०

०००००

नियमांचा अडसर

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. लग्न समारंभासाठी परवानगी घेणे, केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी, मंगल कार्यालये बंद आदी नियमांमुळे लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. अनेकांनी लग्न समारंभ लांबणीवर टाकले आहेत.

०००

यंदा कर्तव्य नाही

कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध असल्यामुळे लग्न समारंभ कसा आयोजित करावा? हा पेच कायम आहे.

- तुकाराम पाटील, वरपिता

.......

लग्न समारंभावर अनेक मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचे संकट, १५ व्यक्तींची उपस्थिती, परवानगी घेणे आदी बाबींमुळे लग्न सोहळा लांबणीवर पडत आहे.

- अजाबराव चव्हाण, वधूपिता

००००

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. मार्च ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. शहरात १७ च्या आसपास मंगल कार्यालये आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर उपस्थितीचे बंधन घालून मंगल कार्यालयांना परवानगी देण्यात आली.

परंतु, मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने उपस्थितीची मर्यादा आणि दंडात्मक कारवाई यामुळे मंगल कार्यालये पुन्हा लॉकडाऊन झाली. मे महिन्यापासून कडक निर्बंध असल्याने मंगल कार्यालये कुलूपबंद आहेत. परिणामी, आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

०००००००००००००००००