शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ओबीसींना न्याय, सन्मान देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

By नंदकिशोर नारे | Updated: October 13, 2023 16:37 IST

बंजाराकाशीत ओबीसी जागर यात्रेचा पहिल्या टप्प्यातील समारोप

वाशिम  : काँग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्री पी. चिदंम्बरम यांनी लोकसभेत म्हटले होते की, देशात एस.सी.एस.टी. शिवाय कोणत्याही जातीची गणना केली जाणार नाही आणि तेच काँग्रेस आज म्हणते की, ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, ओबीसी जनगणलेला भाजपाचा कधीच विरोध नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार विमुक्त भटके आणि ओबीसींना न्याय सन्मान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बंजाराकाशी पोहरादेवी येथे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींची जेवढी चिंता पंतप्रधान मोदींनी केली तेवढी चिंता कोणी केली नाही, मंडल आयोगाला भाजपाने समर्थन केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. प्रधानमंत्री मोदी ओबीसी समाजातील आहेत. त्यामुळे सर्व ओबीसी त्यांच्या पाठीशी आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धर्मपीठ प्रमुख बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, यशवंत महाराज उमरी, केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार हंसराज अहिर, खासदार भावना गवळी, खासदार वाघमारे, रामदास तडस, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार निलय नाईक, वसंत खंडेलवाल, रणधीर सावरकर, प्रतापदादा अडसड, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी मंत्री रणजित पाटील, प्रवीण पोटे, माजी आमदार अनंतकुमार पाटील, ओबीसी सेलचे वाशिम जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, राजू पाटील राजे, देविदास राठोड, माजी आमदार विजय जाधव, आमदार श्वेता महाले, धम्मपाल मेश्राम, महादेव सुपारे, डॉ. संजय कुटे, खासदार डॉ.उमेश जाधव आदि उपस्थित होते. स्वागतपर भाषण आमदार राजेंद्र पाटणी यांनी, प्रास्ताविक भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी, तर संचलन भाजपाचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांनी केले.

राहुल गांधींची मोहब्बत की दुकान बंद होईल

राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान उघडली पण प्रेम दुकानात मिळत नाही म्हणून हे दुकान बंद होईल. मोदी यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या सर्व योजनेचे लाभार्थी एस.सी,एस.टी.आणि ओबीसीचे आहेत. सामाजिक न्यायाच्या गोष्टी विरोधी पक्ष करतात; मात्र भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये मागासवर्गीय आणि ओबीसींचे जास्त मंत्री आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस