शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद!

By admin | Updated: May 16, 2017 01:49 IST

महावितरण हतबल : १३०० पंपाचे उद्दिष्ट; कार्यान्वित झाले २५०

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौर कृषी पंप योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत असून, १३०० पंप मंजूर असताना १५ मे अखेर केवळ २५० पंप कार्यान्वित झाले आहेत. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासन स्तरावरून सौर कृषी पंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी., असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदान दिले जात आहे. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. १५ मे अखेरपर्यंत या योजनेंतर्गत १२५४ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. त्यापैकी ६७१ प्रस्तावांना महावितरणकडून मान्यता देण्यात आली. मात्र, ६७१ पैकी केवळ २७४ लाभार्थींनीच त्यांना देय असलेला लाभार्थी हिस्सा भरला असून, इतर ३९७ लाभार्थींनी यासंदर्भात उदासीनता दर्शविली आहे. त्यातही प्रत्यक्षात केवळ २५० कृषी पंपच आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी योजना फायदेशीरजिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्यांना विविध कारणांमुळे विजेपासून वंचित राहावे लागते. त्यांच्यासाठी सौर कृषी पंप योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय अद्याप विद्युतीकरण न झालेली गावे, महावितरणकडे पैसे भरुनही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा होत नसलेले शेतकरी आदींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. सौर कृषी पंपाची योजना प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. शेतीला अखंडित तथा हक्काची वीज मिळण्यासोबतच वीज देयकांच्या खर्चातूनही शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम