शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद!

By admin | Updated: May 16, 2017 01:49 IST

महावितरण हतबल : १३०० पंपाचे उद्दिष्ट; कार्यान्वित झाले २५०

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौर कृषी पंप योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत असून, १३०० पंप मंजूर असताना १५ मे अखेर केवळ २५० पंप कार्यान्वित झाले आहेत. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासन स्तरावरून सौर कृषी पंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी., असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदान दिले जात आहे. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. १५ मे अखेरपर्यंत या योजनेंतर्गत १२५४ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. त्यापैकी ६७१ प्रस्तावांना महावितरणकडून मान्यता देण्यात आली. मात्र, ६७१ पैकी केवळ २७४ लाभार्थींनीच त्यांना देय असलेला लाभार्थी हिस्सा भरला असून, इतर ३९७ लाभार्थींनी यासंदर्भात उदासीनता दर्शविली आहे. त्यातही प्रत्यक्षात केवळ २५० कृषी पंपच आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी योजना फायदेशीरजिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्यांना विविध कारणांमुळे विजेपासून वंचित राहावे लागते. त्यांच्यासाठी सौर कृषी पंप योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय अद्याप विद्युतीकरण न झालेली गावे, महावितरणकडे पैसे भरुनही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा होत नसलेले शेतकरी आदींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. सौर कृषी पंपाची योजना प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. शेतीला अखंडित तथा हक्काची वीज मिळण्यासोबतच वीज देयकांच्या खर्चातूनही शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम