शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

‘भेटी-गाठी’साठी मिनी मंत्रालय ग्रामस्थांच्या दारी!

By admin | Updated: August 22, 2016 23:59 IST

शौचालय उभारण्याचा आग्रह : स्वच्छतेसाठी वाशिम जिल्हा परिषदेची संपूर्ण टीम प्रयत्नशिल.

वाशिम, दि. २२ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ह्यभेटी-गाठी स्वच्छतेसाठीह्ण या उ पक्रमाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी सोमवारी ग्रामस्थांच्या दारी पोहचले आहेत. वाशिम तालुक्यातील सोनखास या गावांपासून या उ पक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑ क्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या ३५ हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी १२ वाजता या मोहिमेस वाशिम तालु क्यातील सोनखास येथून थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पंचायत समितीचे सभापती गजानन भोने, सुभाष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास कोरडे, गटविकास अधिकारी बचुटे, पंचायत समिती सदस्य आशा गोरे, सरपंच अनुसया गोरे, उपसरपंच शोभा गोरे, डिगांबर गोरे, साहेबराव गोरे, तालुका समन्वयक विलास मोरे, संतोष बोरकर, नंदु इंगळे आदिंची उ पस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी गावातील घरोघरी जावून महिलांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरला. शौचालय नसलेल्या कुटूंबांकडून शौचालय बांधण्याची तारीख घेतली. अनेक कुटुंबांनी दोन दिवसात शौचालय बांधण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. तद्वतच शौचालयासाठी खड्डे खोदलेल्या काही कुटुंबांच्या शौचालय बांधकामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. केवळ पैसे मिळतात, या मानसिकतेने शौचालय न बांधता ती एक महत्वाची गरज समजून शौचालय उभारा व त्याचा नियमित वापर करा, असे आवाहन हर्षदा देशमुख यांनी केले. सहायक गटविकास अधिकारी कांबळे, जिल्हा कक्षाचे माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी अभियानाची माहिती दिली.