शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पीक विम्याचा अत्यल्प लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 15:31 IST

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१९ मध्ये सोयाबिन, उडिद, मूग, कापूस आदी पिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पिकविमा योजनेत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यापोटी विमा कंपनीकडून भरपाई दिली जात आहे; मात्र ती संरक्षित रकमेपेक्षा अगदीच अल्प प्रमाणात असून कापूस पिकाचे नुकसान होऊनही अद्यापपर्यंत त्याची भरपाई विमा कंपनीकडून देण्यासंबंधी कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून याप्रती संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून शेतकºयांच्या पिकांचा विमा उतरविण्यात आला. सोयाबिनसाठी प्रतिहेक्टर ८६० रुपये विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित केलेली असताना शेतकºयांना मात्र १२ हजार ९६० रुपये प्रतिहेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळत आहे. उडिद आणि मूग या पिकांकरिता ३८० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम १९ हजार रुपये प्रतिहेक्टर होत असताना शेतकºयांना केवळ १८७१ ते १९२० रुपयांपर्यंतच प्रतिहेक्टर भरपाई मिळत आहे; तर कापूस या पिकाकरिता २१५० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित करण्यात आलेली आहे; मात्र नुकसानाचे सर्वेक्षण होऊनही भरपाई देण्यासंबंधी कुठलाही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

खरीप हंगाम २०१९ मधील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून सोयाबिन, उडिद आणि मूग या पिकांसाठी १४५ कोटी रुपये मंजूर झाले. शेतकºयांच्या वैयक्तिक दाव्यांवरून खात्यात रक्कम जमा केली जात आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या पद्धतीने मंजूर करण्यात आली, त्याची माहिती कंपनीकडे मागविण्यात आलेली आहे. तसेच कपाशीचे पीक कापणी अहवाल कंपनीकडे पाठविण्यात आले असून विम्याची रक्कम मिळण्यास वेळ लागणार आहे.- एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा