शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पीक विम्याचा अत्यल्प लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 15:31 IST

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१९ मध्ये सोयाबिन, उडिद, मूग, कापूस आदी पिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पिकविमा योजनेत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यापोटी विमा कंपनीकडून भरपाई दिली जात आहे; मात्र ती संरक्षित रकमेपेक्षा अगदीच अल्प प्रमाणात असून कापूस पिकाचे नुकसान होऊनही अद्यापपर्यंत त्याची भरपाई विमा कंपनीकडून देण्यासंबंधी कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून याप्रती संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून शेतकºयांच्या पिकांचा विमा उतरविण्यात आला. सोयाबिनसाठी प्रतिहेक्टर ८६० रुपये विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित केलेली असताना शेतकºयांना मात्र १२ हजार ९६० रुपये प्रतिहेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळत आहे. उडिद आणि मूग या पिकांकरिता ३८० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम १९ हजार रुपये प्रतिहेक्टर होत असताना शेतकºयांना केवळ १८७१ ते १९२० रुपयांपर्यंतच प्रतिहेक्टर भरपाई मिळत आहे; तर कापूस या पिकाकरिता २१५० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित करण्यात आलेली आहे; मात्र नुकसानाचे सर्वेक्षण होऊनही भरपाई देण्यासंबंधी कुठलाही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

खरीप हंगाम २०१९ मधील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून सोयाबिन, उडिद आणि मूग या पिकांसाठी १४५ कोटी रुपये मंजूर झाले. शेतकºयांच्या वैयक्तिक दाव्यांवरून खात्यात रक्कम जमा केली जात आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या पद्धतीने मंजूर करण्यात आली, त्याची माहिती कंपनीकडे मागविण्यात आलेली आहे. तसेच कपाशीचे पीक कापणी अहवाल कंपनीकडे पाठविण्यात आले असून विम्याची रक्कम मिळण्यास वेळ लागणार आहे.- एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा