शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

रेतीघाटांच्या स्वामित्वधनाचे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

वाशिम जिल्ह्यातील १७ रेतीघाट लिलावात गेले नाहीत.त्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यातील सर्व १४२ रेतीघाटांपैकी ३१ रेतीघाटांचा ऑनलाईन लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हाप्रशासनाने तब्बल तीनवेळा राबविली.त्यामध्ये रेती ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.उर्वरित १७ रेतीघाटांची किंमत २५ टक्के कमी करुन चवथ्यांदा ऑनलाईन लिलाव करुनही ठेकेदारांनी ते रेतीघाट लिलावात घेतले नाहीत.त्यानंतर मूळ किंमतीत रेतीघाट घेण्याबाबत जिल्हाप्रशासनाने पाचव्यांदा प्रयत्न केला.पण, रेतीठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर सरकारी विभागांना त्यांच्या कामांसाठी गरजेनुसार रेती उचलून नेण्याचे आवाहन करुनही त्यांनीही रेती नेली नाही.परिणामी, शासनाचे स्वामित्वधनाचे(रॉयल्टी) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकुण १४२ रेती घाट असले तरी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोणातून दरवर्षी मोजक्याच रेतीघाटांचा लिलाव केला जातो. जिल्ह्यातील १४२ रेतीघाटापैकी वाशिम तालुक्यात २४, मालेगाव १४, रिसोड ४२, मंगरुळपीर ३0, मानोरा २१, व कारंजा तालुक्यात ११ रेतीघाट आहेत.सन २0१३-१४ मध्ये वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हयातील १४२ रेतीघाटांचे सर्वेक्षण केले.त्यानंतर त्यापैकी ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्याची परवानगी वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला दिली. विभागीय आयुक्त कार्यालयानेदेखील ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्यास मंजूरी दिली. चारवेळा ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबवूनही ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.त्यापोटी जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला ८३ लाख ६८ हजार २१९ रुपयांचेच उत्पन्न मिळाले. विभागीय आयुक्तांनी उर्वरित १७ रेतीघाट जिल्ह्यातील रेतीकंत्राटदारांशी संपर्क साधून व चर्चा करुन त्यांच्या सरकारी किंमतीत देण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते.त्यानुसार जिल्हा गौणखनिज अधिकारी कार्यालयाने कंत्राटदारांना पत्रे पाठवून रेतीघाट सरकारी किंमतीमध्ये घेण्याबाबत एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एकाही रेती कंत्राटदाराने रेतीघाट घेण्याची तयारी दाखविली नव्हती त्यामुळे सरकारी विभागांना त्यांच्या शासकीय कामांसाठी लागणारी रेती सदर १७ रेतीघाटांवरुन गरजेनुसार पावत्या फाडून घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात आले.परंतु, सरकारी विभागांकडून त्या प्रयत्नास अजिबात प्रतिसाद मिळाला नाही.परिणामी , जिल्ह्यातील १७ रेतीघाट आजपर्यत लिलावात गेले नाहीत.त्यामुळे त्यांच्या सरकारी किंमतीनुसार शासनाचे कोट्यवधी रुपयाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे.