शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटांच्या स्वामित्वधनाचे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

वाशिम जिल्ह्यातील १७ रेतीघाट लिलावात गेले नाहीत.त्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यातील सर्व १४२ रेतीघाटांपैकी ३१ रेतीघाटांचा ऑनलाईन लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हाप्रशासनाने तब्बल तीनवेळा राबविली.त्यामध्ये रेती ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.उर्वरित १७ रेतीघाटांची किंमत २५ टक्के कमी करुन चवथ्यांदा ऑनलाईन लिलाव करुनही ठेकेदारांनी ते रेतीघाट लिलावात घेतले नाहीत.त्यानंतर मूळ किंमतीत रेतीघाट घेण्याबाबत जिल्हाप्रशासनाने पाचव्यांदा प्रयत्न केला.पण, रेतीठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर सरकारी विभागांना त्यांच्या कामांसाठी गरजेनुसार रेती उचलून नेण्याचे आवाहन करुनही त्यांनीही रेती नेली नाही.परिणामी, शासनाचे स्वामित्वधनाचे(रॉयल्टी) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकुण १४२ रेती घाट असले तरी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोणातून दरवर्षी मोजक्याच रेतीघाटांचा लिलाव केला जातो. जिल्ह्यातील १४२ रेतीघाटापैकी वाशिम तालुक्यात २४, मालेगाव १४, रिसोड ४२, मंगरुळपीर ३0, मानोरा २१, व कारंजा तालुक्यात ११ रेतीघाट आहेत.सन २0१३-१४ मध्ये वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हयातील १४२ रेतीघाटांचे सर्वेक्षण केले.त्यानंतर त्यापैकी ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्याची परवानगी वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला दिली. विभागीय आयुक्त कार्यालयानेदेखील ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्यास मंजूरी दिली. चारवेळा ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबवूनही ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.त्यापोटी जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला ८३ लाख ६८ हजार २१९ रुपयांचेच उत्पन्न मिळाले. विभागीय आयुक्तांनी उर्वरित १७ रेतीघाट जिल्ह्यातील रेतीकंत्राटदारांशी संपर्क साधून व चर्चा करुन त्यांच्या सरकारी किंमतीत देण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते.त्यानुसार जिल्हा गौणखनिज अधिकारी कार्यालयाने कंत्राटदारांना पत्रे पाठवून रेतीघाट सरकारी किंमतीमध्ये घेण्याबाबत एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एकाही रेती कंत्राटदाराने रेतीघाट घेण्याची तयारी दाखविली नव्हती त्यामुळे सरकारी विभागांना त्यांच्या शासकीय कामांसाठी लागणारी रेती सदर १७ रेतीघाटांवरुन गरजेनुसार पावत्या फाडून घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात आले.परंतु, सरकारी विभागांकडून त्या प्रयत्नास अजिबात प्रतिसाद मिळाला नाही.परिणामी , जिल्ह्यातील १७ रेतीघाट आजपर्यत लिलावात गेले नाहीत.त्यामुळे त्यांच्या सरकारी किंमतीनुसार शासनाचे कोट्यवधी रुपयाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे.