शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

रेतीघाटांच्या स्वामित्वधनाचे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

वाशिम जिल्ह्यातील १७ रेतीघाट लिलावात गेले नाहीत.त्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यातील सर्व १४२ रेतीघाटांपैकी ३१ रेतीघाटांचा ऑनलाईन लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हाप्रशासनाने तब्बल तीनवेळा राबविली.त्यामध्ये रेती ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.उर्वरित १७ रेतीघाटांची किंमत २५ टक्के कमी करुन चवथ्यांदा ऑनलाईन लिलाव करुनही ठेकेदारांनी ते रेतीघाट लिलावात घेतले नाहीत.त्यानंतर मूळ किंमतीत रेतीघाट घेण्याबाबत जिल्हाप्रशासनाने पाचव्यांदा प्रयत्न केला.पण, रेतीठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर सरकारी विभागांना त्यांच्या कामांसाठी गरजेनुसार रेती उचलून नेण्याचे आवाहन करुनही त्यांनीही रेती नेली नाही.परिणामी, शासनाचे स्वामित्वधनाचे(रॉयल्टी) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकुण १४२ रेती घाट असले तरी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोणातून दरवर्षी मोजक्याच रेतीघाटांचा लिलाव केला जातो. जिल्ह्यातील १४२ रेतीघाटापैकी वाशिम तालुक्यात २४, मालेगाव १४, रिसोड ४२, मंगरुळपीर ३0, मानोरा २१, व कारंजा तालुक्यात ११ रेतीघाट आहेत.सन २0१३-१४ मध्ये वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हयातील १४२ रेतीघाटांचे सर्वेक्षण केले.त्यानंतर त्यापैकी ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्याची परवानगी वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला दिली. विभागीय आयुक्त कार्यालयानेदेखील ३१ रेतीघाटांचे लिलाव करण्यास मंजूरी दिली. चारवेळा ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबवूनही ठेकेदारांनी केवळ १४ रेतीघाटच लिलावात घेतले.त्यापोटी जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला ८३ लाख ६८ हजार २१९ रुपयांचेच उत्पन्न मिळाले. विभागीय आयुक्तांनी उर्वरित १७ रेतीघाट जिल्ह्यातील रेतीकंत्राटदारांशी संपर्क साधून व चर्चा करुन त्यांच्या सरकारी किंमतीत देण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते.त्यानुसार जिल्हा गौणखनिज अधिकारी कार्यालयाने कंत्राटदारांना पत्रे पाठवून रेतीघाट सरकारी किंमतीमध्ये घेण्याबाबत एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एकाही रेती कंत्राटदाराने रेतीघाट घेण्याची तयारी दाखविली नव्हती त्यामुळे सरकारी विभागांना त्यांच्या शासकीय कामांसाठी लागणारी रेती सदर १७ रेतीघाटांवरुन गरजेनुसार पावत्या फाडून घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात आले.परंतु, सरकारी विभागांकडून त्या प्रयत्नास अजिबात प्रतिसाद मिळाला नाही.परिणामी , जिल्ह्यातील १७ रेतीघाट आजपर्यत लिलावात गेले नाहीत.त्यामुळे त्यांच्या सरकारी किंमतीनुसार शासनाचे कोट्यवधी रुपयाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे.