शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

दुष्काळातही लाखोंची ‘धुळवड’!

By admin | Updated: March 26, 2016 02:24 IST

रासायनिक रंगांना कमी पसंती; जलमुक्त होळीला प्राधान्य.

शिखरचंद बागरेचा/वाशिमधूलिवंदनाच्या दिवशी जिल्हावासियांनी पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य दिल्याचे बाजारपेठेतील आकडेवारीवरून दिसून येते. इको फ्रेन्डली रंग व अन्य साहित्याची १२ लाखांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज असून, रासायनिक रंगांना ग्राहकांनी पसंती दिली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे सतत नापिकीला सामोर्‍या जाणार्‍या व यावर्षी दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या वाशिम जिल्हय़ातील शौकिनांनी होळी सणानिमित्त रंगात रंगून लाखोंची धुळवड केली. होळी सणाच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होऊन आधुनिकतेची भर पडत आहे. विविध प्रकारच्या रंगांचा वापर करून प्रत्येक जण एकमेकाला रंग लावून ह्यहोळीह्ण साजरी करतो. यावर्षीही दुष्काळाच्या आगीत होरपळलेल्या वाशिम जिल्हय़ात रंगप्रेमींनी लाखो रुपयांचे रंग उधळून धुळवड साजरी केली. काही संघटना यासाठी अपवाद ठरल्या असून, या सामाजिक संघटनांनी जलमुक्त रंगपंचमी साजरी करून एक चांगला संदेश दिला. जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा या शहरांसोबत तालुक्यातील व्यावसायिकांनी विविध प्रकारचे रंग, रंग उडविणार्‍या पिचकार्‍या, आकर्षक व रंगीन टिपोर्‍या इत्यादी साहित्यांची तब्बल १२ लाख रुपयांची विक्री केली, असा प्राथमिक अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला. रंगपंचमीच्या दिवशी जिल्हय़ात सर्वत्र रंग खेळणार्‍यांमध्ये युवा पिढी अग्रेसर होती. जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती व दुष्काळ वातावरणाचा रंगप्रेमी कुठल्याच प्रकारचा ताण डोक्यावर न घेता रंगपंचमीचा मात्र मनसोक्त आनंद घेतल्याचे दिसून आले. 'ड्रंक अँण्ड ड्राइव्ह'प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली.