शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुधाचे दर जैसे थे; मिठाईचे दर मात्र वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १६० रुपये प्रती किलोच्या वर गेले असताना डाळीही ...

गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १६० रुपये प्रती किलोच्या वर गेले असताना डाळीही महागल्या आहेत. त्यामुळे तयार पदार्थांच्या दरावरही परिणाम होत असून, सणासुदीच्या काळात वाढती मागणी लक्षात घेता दुधाचे दर जैसे-थे असतानाही दुधापासून बनविल्या जाणाऱ्या मिठाईचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून, सणासुदीच्या काळातच मिठाईचा गोडवा कमी झाल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

----------------

का वाढले दर ?

१) कोट : दुधाचे दर जैसे-थे असले तरी तेल, साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात मिठाई तयार करून विकणे अशक्य झाले आहे. त्यात ग्राहकांची संख्याही घटल्याने आम्हाला नाईलाजास्तव दरवाढ करावी लागली.

- पूनम बिष्णोई,

स्वीटमार्ट चालक

-----------

२) कोट : कोरोना संसर्ग काळात आमचे मोठे नुकसान झाले. आताही ग्राहकांची संख्या कमीच आहे. त्यात तेलाचे दर १६० रुपयांवर असून, साखरही पाच रुपयांनी महागली. त्यामुळे दुधाचे दर ‘जैसे थे’ असले तरी मिठाई पूर्वीच्या दरात विकणे परवडणारे राहिले नाही.

-ईश्वर मेहता,

स्वीटमार्ट चालक

०००००००००००००००००००

ग्राहक म्हणतात

१) कोट: दुधाचे आणि तेलाचे दर जैसे थे आहे; परंतु मिठाईच्या दरात मात्र प्रती किलोमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई महागल्याने खिशाला मोठी झळ पोहोचत आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या महागाईमुळे जीवनच कठीण झाले आहे.

- अमोल कोळकर,

ग्राहक

-----------

२) कोट : सद्य:स्थितीत ज्येष्ठा गौरी आणि गणेशोत्सवासारखे सण साजरे केले जात आहेत. या सणात प्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी मिठाईचा वापर करावा लागतो. त्यात मिठाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खर्चात वाढ झाली असून, सणवाराचा गोडवाच आता घटला आहे.

-राजेश अहिरकर,

ग्राहक

०००००००००००००००००००००००००००

मिठाईचे दर प्रतिकिलो

पेढा-

गणेशोत्सवापूर्वी ३००, सध्याचा दर ३२०

कलाकंद-

गणेशोत्सवापूर्वी ३२०, सध्याचा दर ३६०

जिलेबी-

गणेशोत्सवापूर्वी १००, सध्याचा दर १२०

मोतीचूर लाडू

गणेशोत्सवापूर्वी २००, सध्याचा दर २४०