शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन संच नमूने तपासणीला ‘खो’!

By admin | Updated: August 18, 2016 00:25 IST

अमरावती विभागात सूक्ष्म सिंचन संचाची नमूने तपासणीकडे कृषी विभागाचा कानाडोळा.

सुनील काकडे वाशिम, दि. १७ : शासनाकडून अनुदानावळ शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सूक्ष्म सिंचन संचाचे वाटप करण्यापूर्वी अधिकृत कंपन्यांकडून पुरविल्या जाणार्‍या साहित्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविणे अनिवार्य आहे. मात्र, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील कृषी विभागाने या महत्वपूर्ण बाबीकडे कानाडोळा केला. परिणामी, गेल्या अनेक वर्षांंंंपासून संच पुरविणार्‍या कंपन्या गब्बर झाल्या असताना शेतकर्‍यांना मात्र निकृष्ट दर्जाच्या साहित्यावर समाधान मानावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकर्‍यांना राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानातून ठिबक संच पुरविण्याचे काम केले जाते. यासाठी शंभराहून अधिक कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यातीलच पुणे येथील फिनोलेक्स प्लासान इंडस्ट्रिज लिमिटेड, जळगावमधील तुलसी एक्स्ट्रयुशन लिमिटेड, गुजरातमधील विशाखा इरिगेशन प्रा. लिमिटेड आणि नाशिक येथील ईपीसी इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांनी पुरविलेले सुक्ष्म सिंचन संचाचे साहित्य अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्याने ३0 जुलै २0१६ रोजी कृषी आयुक्तालयाने संबंधित चारही कंपन्यांचे परवाने रद्द करून आगामी १0 वर्षासाठी संच पुरवठय़ावर बंदी लादली. यावरून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुक्ष्म सिंचन संचासंबंधीचे निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात सजग राहून कृषी विभागाने वेळोवेळी संच नमुने घेवून कृषी आयुक्त कार्यालयामार्फत मांजरी येथील वसंतदादा शूगर इन्स्टिट्युटकडे तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम यापैकी एकाही जिल्ह्यातील कृषी विभागाने याकामी अद्याप पुढाकार घेतलेला नाही. यायोगे या गंभीर प्रश्नावर पांघरूण घालण्याचा प्रकार कृषी विभागातूनच सुरू असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे.

*कोट्यवधी रुपयांचे अनुदानही रखडले!सुक्ष्म सिंचन संचाचे नमुने तपासण्याकामी कृषी विभागाने प्रचंड उदासिनता बाळगली असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील १८ हजार शेतकर्‍यांचे २५ कोटी रुपये अनुदान २ वर्षांंंंपासून शासनाकडे प्रलंबित आहे. - सुक्ष्म सिंचन संचाचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून पुरविल्या जाणार्‍या साहित्यांचे नमूने निश्‍चितपणे तपासणीला पाठविले जातात. २0१५ मध्ये २0 नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल मात्र अद्याप अप्राप्त आहे. मुरलीधर इंगळेउपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम