शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगची सक्ती हवी, लॉकडाऊन नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली ...

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसह व्यावसायिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आधीच्या लॉकडाऊनमधून अद्याप सर्व क्षेत्र पूर्णपणे सावरले नसतानाच पुन्हा लॉकडाऊन केल्यास व्यवसाय पूर्णपण कोलमडण्याची वेळ येण्याची भीती उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियम कडक करावे, मात्र लॉकडाऊन नकोच, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून जवळपास सात महिने कठोर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व उद्योग, धंदे बाजारपेठा बंद होत्या. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. अनलॉक झाल्यानंतरही बहुतांश गोष्टींवर निर्बंध होते. सम-विषमचा नियम होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र बिघडले, तर कुठे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली होती. नोव्हेंबर महिन्यापासून झालेल्या अनलॉकमुळे त्यापासून दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात परिस्थिती पाहून लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने व्यापार, उद्योग संघटनांत चिंतेचे वातावरण पसरले असून, शासनाने पूर्णत: लॉकडाऊन न करता मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासह इतर नियम अधिक कडक करावेत; परंतु लॉकडाऊन करू नये, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

---------------------------

कोट: कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन जनतेनेही आपले कर्तव्य समजून कोरोना नियंत्रणासाठी शिस्त पाळणे आवश्यक आहे. व्यापारी, उद्योजकांसह सर्व सामान्यांचे पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान पाहता निर्बंध कडक करावेत मात्र पुन्हा लॉकडाऊन करू नये.

-विशाल दिलिपकुमार मालपाणी

व्यावसायिक,

---------------------------

कोट: कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सभा यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत होणाºया गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास मदत होते. त्यामुळे बेशिस्त नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे. नियम कडक करणे आवश्यक आहे; परंतु लॉकडाऊन पुन्हा नकोच.

- जुगल किशोर कोठारी

उद्योजक

--------------------------

कोट: पूर्वीच्या लॉकडाऊनचे भीषण परिणाम सर्वसामान्यांसह उद्योग, व्यावसायिकांना सहन करावे लागले. काहींना, तर कर्ज काढून पुन्हा व्यवसाय सुरू करावा लागला. आठ महिने निर्बंधांचे पालन करून पुन्हा नव्याने सुरुवात करणाºयांसह सर्वसामान्यांना आता लॉकडाऊन परवडणारच नाही. हवे तर नियम अधिक कठोर करायला हवेत.

-आनंद चरखा,

अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम

-------

गर्दीवर नियंत्रणाअभावी धोका वाढतोय

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातच ३५८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरासह ग्रामीण भागांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धोका वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत.

------

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह - ७६४८

अ‍ॅक्टिव्ह - ३८६