शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगची सक्ती हवी, लॉकडाऊन नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली ...

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसह व्यावसायिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आधीच्या लॉकडाऊनमधून अद्याप सर्व क्षेत्र पूर्णपणे सावरले नसतानाच पुन्हा लॉकडाऊन केल्यास व्यवसाय पूर्णपण कोलमडण्याची वेळ येण्याची भीती उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियम कडक करावे, मात्र लॉकडाऊन नकोच, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मार्च २०२० पासून जवळपास सात महिने कठोर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व उद्योग, धंदे बाजारपेठा बंद होत्या. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. अनलॉक झाल्यानंतरही बहुतांश गोष्टींवर निर्बंध होते. सम-विषमचा नियम होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र बिघडले, तर कुठे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली होती. नोव्हेंबर महिन्यापासून झालेल्या अनलॉकमुळे त्यापासून दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात परिस्थिती पाहून लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने व्यापार, उद्योग संघटनांत चिंतेचे वातावरण पसरले असून, शासनाने पूर्णत: लॉकडाऊन न करता मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासह इतर नियम अधिक कडक करावेत; परंतु लॉकडाऊन करू नये, असे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

---------------------------

कोट: कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन जनतेनेही आपले कर्तव्य समजून कोरोना नियंत्रणासाठी शिस्त पाळणे आवश्यक आहे. व्यापारी, उद्योजकांसह सर्व सामान्यांचे पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान पाहता निर्बंध कडक करावेत मात्र पुन्हा लॉकडाऊन करू नये.

-विशाल दिलिपकुमार मालपाणी

व्यावसायिक,

---------------------------

कोट: कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सभा यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत होणाºया गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास मदत होते. त्यामुळे बेशिस्त नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे. नियम कडक करणे आवश्यक आहे; परंतु लॉकडाऊन पुन्हा नकोच.

- जुगल किशोर कोठारी

उद्योजक

--------------------------

कोट: पूर्वीच्या लॉकडाऊनचे भीषण परिणाम सर्वसामान्यांसह उद्योग, व्यावसायिकांना सहन करावे लागले. काहींना, तर कर्ज काढून पुन्हा व्यवसाय सुरू करावा लागला. आठ महिने निर्बंधांचे पालन करून पुन्हा नव्याने सुरुवात करणाºयांसह सर्वसामान्यांना आता लॉकडाऊन परवडणारच नाही. हवे तर नियम अधिक कठोर करायला हवेत.

-आनंद चरखा,

अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम

-------

गर्दीवर नियंत्रणाअभावी धोका वाढतोय

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातच ३५८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरासह ग्रामीण भागांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धोका वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत.

------

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह - ७६४८

अ‍ॅक्टिव्ह - ३८६