शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी वातावरण अनुकूल !

By admin | Updated: November 14, 2014 01:17 IST

सहकार विभागाकडून विलंब; शेतकर्‍यांची गैरसोय.

अकोला : राज्य शासनाच्या सहकार विभागाने संचालक मंडळाची मुदत संपलेल्या राज्यातील शंभर बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत; पंरतु या समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाला विलंब होत असल्याने संचालकांमध्ये नाराजी तर आहेच, शिवाय सध्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक सुरू झाल्याने शेतकर्‍यांची कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.राज्यातील शंभरावर बाजार समितीत्यांच्या संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वीच संपली होती; तथापि गतवर्षीची अतवृष्टी आणि त्यांनतर लागलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमुळे बाजार समित्यांची निवडणूक सहकार विभागाने पुढे ढकलली होती. त्यामुळे शासनाने काही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले होते. या निर्णयाला बाजार समित्यांनी न्यायालयात आव्हान दिल्याने, काही काळ विद्यमान संचालक स्थानापन्न होते. अकोल्याच्या बाजार समितीनेही याबाबत मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. त्यामुळे या बाजार समितीवर पुन्हा संचालक मंडळ आरू ढ झाले होते. हा स्थगनादेश अल्प कालावधीसाठी असल्याने, सहकारी उपनिंबधक कार्यालयाने पुन्हा प्रशासकाची नेमणूक केली; पंरतु शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्याने, शासनाने अकोला बाजार समितीसह राज्यातील इतर बाजार समित्यांवर संचालकांचे अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते. या मंडळाच्या अध्यक्षपदी बाजार समित्यांच्या सभापतींची निवड केली होती. नवे सरकार येताच सहाकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व बाजार समित्यावंरील अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त केले असून, नव्याने प्रशासक नेमणुकीचे आदेश काढले आहेत. यातील बहुतांश बाजार समित्यांवर बुधवार , १२ नोव्हेंबर रोजीच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.एक वर्षापासून शासनाकडून बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी विलंब होत असून, अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. खरीप हंगाम आणि शेतमालाची बाजारातील आवक बघता, निवडणुका होईपर्यत ही मंडळं कार्यरत ठेवण्याची गरज होती; पण मंडळ बरखास्त केल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांनी स्पष्ट केले.