शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:56 IST

दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग  पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद  राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले  सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत

ठळक मुद्दे शेतकर्‍यांची पंचाईत सोयाबीन राहणार घरात पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग  पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद  राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले  सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत. यंदाचे वर्ष शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक  ठरले असून, गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल  २00 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही.  नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतु त्या तही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकर्‍यांना सामना करावा  लागला. अशातच खरीप हंगामास प्रारंभ झाला. मात्र, सुरुवाती पासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख  पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनची पार दाणादाण  उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर  मात करीत शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे; परंतु  सरासरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून, लावलेला  लागवड खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन  बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे, त्यांची  व्यापारीवर्गाकडून प्रचंड हेटाळणी सुरू असून, अपेक्षित तथा  योग्य दर मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच बाजार समि त्यांनीदेखील याबाबत कमालीची उदासीनता बाळगली असून,  येत्या १८ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत बाजार समित्या  बंद राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही बाब  लक्षात घेऊन बाजार समित्यांनी किमान दिवाळीच्या दुसर्‍या  दिवसापासून तरी व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी शे तकर्‍यांमधून होत आहे. 

व्यापार्‍यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळले!वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणीधारक व्या पार्‍यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मनमानी कारभार सुरू केला  असून, कुठल्याही व्यापार्‍याच्या घरी कुठलाही कार्यक्रम  (मरण-धरण, विवाह सोहळा, वाढदिवस) असला, तरी  ठरावीक त्यादिवशी बाजार समितीमधील व्यवहार पूर्णत: बंद  ठेवले जात आहेत. परिणामी, वर्षभरातून जास्तीत जास्त सहाच  महिने बाजार समिती सुरळीत सुरू असते. यात शेतकर्‍यांना  नाहक मन:स्ताप सोसावा लागत असून, व्यापार्‍यांच्या या  मनमानीला शेतकरी कंटाळल्याची माहिती बाजार समितीचे  विद्यमान संचालक राजू चौधरी यांनी दिली.

दिवाळी सणानिमित्त बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवणे, हा  त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. असे असले तरी बाजार समिती  प्रशासनाशी चर्चा करून पाच दिवसांऐवजी दोन दिवस बंद ठेवून  व्यवहार पूर्ववत करण्याबाबत सूचना दिल्या जातील.- रमेश कटकेसहायक उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :agricultureशेती