शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:56 IST

दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग  पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद  राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले  सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत

ठळक मुद्दे शेतकर्‍यांची पंचाईत सोयाबीन राहणार घरात पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग  पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद  राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले  सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत. यंदाचे वर्ष शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक  ठरले असून, गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल  २00 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही.  नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतु त्या तही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकर्‍यांना सामना करावा  लागला. अशातच खरीप हंगामास प्रारंभ झाला. मात्र, सुरुवाती पासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख  पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनची पार दाणादाण  उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर  मात करीत शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे; परंतु  सरासरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून, लावलेला  लागवड खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन  बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे, त्यांची  व्यापारीवर्गाकडून प्रचंड हेटाळणी सुरू असून, अपेक्षित तथा  योग्य दर मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच बाजार समि त्यांनीदेखील याबाबत कमालीची उदासीनता बाळगली असून,  येत्या १८ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत बाजार समित्या  बंद राहणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही बाब  लक्षात घेऊन बाजार समित्यांनी किमान दिवाळीच्या दुसर्‍या  दिवसापासून तरी व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी शे तकर्‍यांमधून होत आहे. 

व्यापार्‍यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळले!वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणीधारक व्या पार्‍यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मनमानी कारभार सुरू केला  असून, कुठल्याही व्यापार्‍याच्या घरी कुठलाही कार्यक्रम  (मरण-धरण, विवाह सोहळा, वाढदिवस) असला, तरी  ठरावीक त्यादिवशी बाजार समितीमधील व्यवहार पूर्णत: बंद  ठेवले जात आहेत. परिणामी, वर्षभरातून जास्तीत जास्त सहाच  महिने बाजार समिती सुरळीत सुरू असते. यात शेतकर्‍यांना  नाहक मन:स्ताप सोसावा लागत असून, व्यापार्‍यांच्या या  मनमानीला शेतकरी कंटाळल्याची माहिती बाजार समितीचे  विद्यमान संचालक राजू चौधरी यांनी दिली.

दिवाळी सणानिमित्त बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवणे, हा  त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. असे असले तरी बाजार समिती  प्रशासनाशी चर्चा करून पाच दिवसांऐवजी दोन दिवस बंद ठेवून  व्यवहार पूर्ववत करण्याबाबत सूचना दिल्या जातील.- रमेश कटकेसहायक उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :agricultureशेती