शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

मंगरुळपीर तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:52 IST

 मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षीत पुर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहूतांश तलावाची पाण्याची मोठ्या प्रमाणात खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे ...

ठळक मुद्देनदीपात्र पडले कोरडे तालुक्यात ६६ टक्केच पाऊस

 मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षीत पुर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहूतांश तलावाची पाण्याची मोठ्या प्रमाणात खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस  पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १, चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री ०३४, सावरगाव ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,  चोरद ४० टक्के,  झोडगा ३२.५०, उंद्री ३२.७० , जोगदलदरी २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिंताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा चाºयाचा पिण्याचा पाण्याची बिकट होणार आहे. नदी, नाले, पुर्तता कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध विहीरीतील पाणी काढुन आपल्या पशुची तहान भागवावी लागत आहे. मोतसावंगा प्रकल्पातुन मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश्क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन व लोकप्रतिनिधी गांभीर्याने होत नसल्याचे दिसुन येते.