शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मालेगावात काँग्रेस, राकाँचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:58 IST

मालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .   

ठळक मुद्देशिवसेना पिछाडीवर: भाजपाच्या जागा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .   तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी नागतरतास ग्रामपंचायत अविरोध झाली होती. तिथे अनंतराव देशमुख यांचे सर्मथक गजानन देवळे यांच्या गटाचा विजय झाला. राष्ट्रवादी काँगेसचे सर्मथक २४ पेक्षा जास्त ग्रामपंचायतचे सरपंच झाले आहेत. ६ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे सर्मथ सरपंच झाले; तर भाजपाचे सर्मथक १४ ग्रामपंचायतचे सरपंच झाले असून ४ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्मथक सरपंच झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे .दरम्यान, निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सर्मथक सरपंचांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आला, भाजपा सर्मथक सरपंचांचा सत्कार गोपाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झाला. रा.कॉ.तर्फे माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, संचालक गणेश उंडाळ, तालुकाध्यक्ष संजय दहात्रे आदिंनी सर्मथकांच्या विजयाकरिता परिश्रम घेतले. काँग्रेसतर्फे गजाननराव देवळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश बळी यांनी परिश्रम घेतले. भाजपातर्फे गोपाल पाटील राऊत, तालुकाध्यक्ष तानाजी पवार यांनी परिश्रम घेतले.