शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

यादी बनविताना दमछाक!

By admin | Updated: July 11, 2017 02:05 IST

कर्जमाफीची यादी : बँकांसह प्रशासनाची धावपळ, शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतर, दीड लाख मर्यादेपर्यंत किती शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येतील, याची आकडेवारी घेण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. आकडेवारी हाती येण्यास प्रचंड विलंब होत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयातील तरतुदी, अटी व शर्तीचा अभ्यास केल्यानंतर बँक प्रशासन व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे; मात्र अद्याप निश्चित आकडेवारी हाती येत नसल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी नेते व पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे दिसून येते. सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या कालावधीत पीक कर्जाची उचल करणारे; परंतु ३० जून २०१६ रोजी कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांचा निश्चित आकडा किती आहे, यामध्ये दीड लाख मर्यादेपर्यंतचे शेतकरी किती, यापैकी नोकरदार व निकषानुसार अपात्र शेतकरी किती, याचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २४ हजार ३३५ अशी आहे. या शेतकऱ्यांकडे ९७ कोटी २३ लाख रुपयांच्या आसपास कर्ज थकीत आहे. यापैकी २३ हजार ५३१ शेतकरी हे दीड लाख रुपये कर्जमाफीच्या कक्षेत येतात. यापैकी किती शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत झाली, याचा लेखाजोखा अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला याद्या प्राप्त झालेल्या नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्यादेखील अप्राप्तच आहेत. बँकांकडून अधिकृत माहिती मिळत नसल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत. यादी तयार होण्याला विलंब होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला अद्यापही सुरुवात झाली नसल्याची माहिती आहे. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जवळपास ९० टक्के काम पूर्णत्वाकडे आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे ५० ते ६० टक्क्यादरम्यान यादी बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या काही दिवसातच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती पूर्णत्वाकडे येईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम.