शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

यादी बनविताना दमछाक!

By admin | Updated: July 11, 2017 02:05 IST

कर्जमाफीची यादी : बँकांसह प्रशासनाची धावपळ, शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतर, दीड लाख मर्यादेपर्यंत किती शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येतील, याची आकडेवारी घेण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. आकडेवारी हाती येण्यास प्रचंड विलंब होत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयातील तरतुदी, अटी व शर्तीचा अभ्यास केल्यानंतर बँक प्रशासन व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे; मात्र अद्याप निश्चित आकडेवारी हाती येत नसल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी नेते व पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे दिसून येते. सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या कालावधीत पीक कर्जाची उचल करणारे; परंतु ३० जून २०१६ रोजी कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांचा निश्चित आकडा किती आहे, यामध्ये दीड लाख मर्यादेपर्यंतचे शेतकरी किती, यापैकी नोकरदार व निकषानुसार अपात्र शेतकरी किती, याचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २४ हजार ३३५ अशी आहे. या शेतकऱ्यांकडे ९७ कोटी २३ लाख रुपयांच्या आसपास कर्ज थकीत आहे. यापैकी २३ हजार ५३१ शेतकरी हे दीड लाख रुपये कर्जमाफीच्या कक्षेत येतात. यापैकी किती शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत झाली, याचा लेखाजोखा अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला याद्या प्राप्त झालेल्या नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्यादेखील अप्राप्तच आहेत. बँकांकडून अधिकृत माहिती मिळत नसल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत. यादी तयार होण्याला विलंब होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला अद्यापही सुरुवात झाली नसल्याची माहिती आहे. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जवळपास ९० टक्के काम पूर्णत्वाकडे आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे ५० ते ६० टक्क्यादरम्यान यादी बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या काही दिवसातच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती पूर्णत्वाकडे येईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम.