शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

By admin | Updated: November 30, 2014 00:23 IST

शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’

वाशिम: राज्यावर दुष्काळाची छाया अधीक गडद होत असतानाच, मालेगाव तालुक्यातील एका ७३ वर्षीय वृध्द शेतकर्‍याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करुन इच्छामरणाची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.आपली शेतजमीन शासनाला प्रकल्पासाठी दिल्यापासून आजतागायत न्यायालयाच्या पायरीशिवाय पदरात काहीच पडले नाही, अशी फिर्यादच मेडशीच्या श्रीराम सकरु राठोड यांनी मांडली त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून आहे. प्रकल्पासाठी जमीन दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधल्या जाते. प्रत्यक्षात आपण प्रकल्पग्रस्त नसून, शासनग्रस्त आहोत, असे श्रीराम राठोड यांनी म्हटले आहे. राज्यात आजवर अनेकदा सत्तांतर झाले. अनेक लोक मंत्री, मुख्यमंत्री झाले; परंतू प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही कायम आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न्यायोचीत मार्गाने व प्राधान्याने कधीच सोडविल्या गेला नाही. उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेतजमीन प्रकल्पासाठी दिल्यानंतर, मोबदल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन देऊन, आपल्या पदरात न्यायालयाच्या पायरीशिवाय मिळते काय, असा उद्विग्न करणारा सवाल श्रीराम राठोड यांनी उपस्थित केला आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली वडिलोपार्जीत जमीन आपण प्रकल्पासाठी दिली. बदल्यात न्यायालयाच्या पायरीशिवाय आपल्याला काहीच मिळाले नाही. आता वृध्दापकाळात न्यायालयाची पायरी चढणे शक्य होत नसल्याने, आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राठोड यांनी वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. श्रीराम सकरु राठोड यांच्या निवेदनामुळे प्रकल्पांसाठी जमीन संपादित केल्या गेलेल्या शेतकर्‍यांची व्यथा अधोरेखीत झाली आहे.