शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

एम. एस. गोटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

वाशिम - शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित शिबिरांतर्गत १२ मार्च ...

वाशिम - शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित शिबिरांतर्गत १२ मार्च रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही. एन. लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे यांनी केले. त्यांनी भारताच्या पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत झालेल्या विविध चळवळींचा आणि स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये १८५७चा रणसंग्राम ते १९४२च्या चलेजाव आंदोलनापर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, मदनलाल धिंग्रा व सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल घटनांवर माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. व्ही. एन. लांडे यांनी १८५७च्या उठावातील नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, तात्या टोपे, बहादूरशहा जफर यांच्या कार्याची माहिती दिली. युवकांनी अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचा आदर्श घेऊन देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन यावेळी केले. डॉ. जी. एस. कुबडे व संजय गोटे यांनी आज देशाला भारताच्या वास्तविक इतिहासाची, मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव व जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. यावेळी डॉ. फिरोज खान, डॉ. एस. व्ही. रूक्के, डॉ. डी. आर. दामोदर, डॉ. डी. एन. लांजेवार, डॉ. व्ही. ई. डोणगांवकर, प्रा. बी. डी. पट्टेबहाद्दूर, डॉ. आर. जी. बोंडे आदींची उपस्थिती होती.