शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मीटर रीडिंगला खो; ग्राहकांना भुर्दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:44 IST

विजेच्या वापरानुसार ग्राहकांना वीज देयकाची आकारणी होणे आवश्यक आहे. यासाठी मीटर रीडिंग अनिवार्य असून, महावितरणतर्फे एजन्सीची नियुक्तीदेखील केली आहे. ...

विजेच्या वापरानुसार ग्राहकांना वीज देयकाची आकारणी होणे आवश्यक आहे. यासाठी मीटर रीडिंग अनिवार्य असून, महावितरणतर्फे एजन्सीची नियुक्तीदेखील केली आहे. मात्र, एजन्सीकडून नियमित मीटर रीडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके मिळत आहेत. काही ग्राहकांना अंदाजे देयक आकारणी होत असल्याने तीन, चार महिन्यांनंतर ३० ते ४० हजारांपर्यंत वीजदेयक दिले जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. वीज देयकाचा भरणा वेळेवर न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणारे महावितरण, मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे.

ज्या महिन्यात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही, त्या महिन्यातील देयक संबंधित ग्राहकाला यापूर्वीच्या सरासरी वीज वापरानुसार आकारले जाते. १०० युनिटपेक्षा जास्त युनिट झाले तर वीज आकारणी शुल्कातही वाढ होते. नियमित दरमहा मीटर रीडिंग न घेण्यामुळे १०० पेक्षा जास्त युनिट झाले तर अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना बसतो.

मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध महावितरण काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

००००

संबंधित एजन्सीने मीटर रीडिंग नियमित घ्यावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. मीटर रीडिंग घेतले नाही तर ‘अ‍ॅव्हरेज’नुसार देयक आकारणी केली जाते. मीटर रीडिंग नियमित होत नसल्यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार केल्यास संबंधित एजन्सीविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते.

- आर. जे. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम