शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

‘कर्जमाफी’चे संकेतस्थळ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतकºयांना अर्ज सादर करण्याची वेळ येत आहे.राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ...

ठळक मुद्दे बँकेत जाऊन आॅफलाइन पद्धतीने भरावे लागणार अर्जशेतक-यांची तारांबळ :

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतकºयांना अर्ज सादर करण्याची वेळ येत आहे.राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांनी आॅनलाइन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर २०१७ अशी आहे. तांत्रिक कारणामुळे सदर आॅनलाइन सुविधा अद्यापही वाशिम जिल्ह्यात आॅफलाइन असल्याचे दिसून येते.शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकºयांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होण्यास बराच विलंब लागत आहे. सुरुवातीला सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज काढणारे; परंतु ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा शासन निर्णय झाला. त्यानंतर सन २००९-१० पासून ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांनादेखील दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आता प्रत्यक्ष कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्याला सुरुवात झाली आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर किंवा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सीएसएमएसएसवाय डॉट इन या संकेतस्थळावर शेतकºयांना कर्जमाफीसंदर्भात आॅनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी जात आहेत; मात्र संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांना परत यावे लागत आहे.दुसरीकडे संबंधित बँकेत शेतकºयांना आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज भरता येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीदेखील वाशिम शहरातील काही बँकांना भेट देऊन आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज स्वीकारण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना द्विवेदी यांनी केल्या. पात्र शेतकºयांना आॅनलाइन किंवा आॅफलाइन यापैकी कोणत्याही एका स्वरुपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.