शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

‘कर्जमाफी’चे संकेतस्थळ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतकºयांना अर्ज सादर करण्याची वेळ येत आहे.राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ...

ठळक मुद्दे बँकेत जाऊन आॅफलाइन पद्धतीने भरावे लागणार अर्जशेतक-यांची तारांबळ :

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतकºयांना अर्ज सादर करण्याची वेळ येत आहे.राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांनी आॅनलाइन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर २०१७ अशी आहे. तांत्रिक कारणामुळे सदर आॅनलाइन सुविधा अद्यापही वाशिम जिल्ह्यात आॅफलाइन असल्याचे दिसून येते.शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकºयांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होण्यास बराच विलंब लागत आहे. सुरुवातीला सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज काढणारे; परंतु ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा शासन निर्णय झाला. त्यानंतर सन २००९-१० पासून ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असणाºया शेतकºयांनादेखील दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आता प्रत्यक्ष कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्याला सुरुवात झाली आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर किंवा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सीएसएमएसएसवाय डॉट इन या संकेतस्थळावर शेतकºयांना कर्जमाफीसंदर्भात आॅनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी जात आहेत; मात्र संकेतस्थळ बंद असल्याने शेतकºयांना परत यावे लागत आहे.दुसरीकडे संबंधित बँकेत शेतकºयांना आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज भरता येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीदेखील वाशिम शहरातील काही बँकांना भेट देऊन आॅफलाइन पद्धतीने कर्जमाफीसंदर्भातील अर्ज स्वीकारण्याच्या पद्धतीची माहिती घेतली. आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना द्विवेदी यांनी केल्या. पात्र शेतकºयांना आॅनलाइन किंवा आॅफलाइन यापैकी कोणत्याही एका स्वरुपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.