शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जीवनदान महागले!

By admin | Updated: June 21, 2014 00:35 IST

रक्तघटकाच्या दरात घसघसीत वाढ: सर्वसामान्यावर वाढला बोझा.

वाशिम : दात्यांकडून घेतलेले रक्त व त्यामधील घटकांवर प्रक्रिया करून ते सुरक्षितपणे साठविण्याची प्रक्रिया खर्चिक बनल्यामुळे रक्ताचे दर दुप्पटीकडे झेपावले आहेत. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यामध्येच सुधारित दरपत्रक जारी केले होते. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही सुधारित दरपत्रक जारी केले असून त्यामध्ये अवघ्या ८५0 रुपयांना मिळणार्‍या रक्तपिशवीची मूळ किंमत तब्बल १ हजार ४५0 रुपये करण्यात आले आहेत. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! आज रक्ताचे दर वाढल्यामुळे जीवनच महागले, अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून ऐकावयास मिळत आहेत. रक्ताचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेने एक समिती गठित केली. या समितीमध्ये खासगी रक्तपेढी, रेडक्रॉस, शासकीय रक्तपेढी व अन्न व औषधी प्रशासनाच्या प्रतिनिधींसह एकूण १६ सदस्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या पाहणीमध्ये रक्तसंकलनानंतर रक्त व रक्तघटकांवर करावी लागणारी प्रक्रिया अधिक खर्चिक बनल्याचे निदर्शनास आले. तसेच अद्ययावत यंत्रांद्वारे तपासण्या केलेले रक्त रुग्णांना पुरविण्यासाठी रक्तपेढ्यांना न परवाडणार्‍्या दरात वितरित करावे लागत होते. याचा परिणाम रक्ताच्या सुरक्षिततेवरही जाणवत होता. अभ्यास समितीने या बाबी राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर मांडल्यामुळे रक्ताचे दर वाढविण्याचा निर्णय झाला असुन सदर परिपत्रक जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले आहे.