शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

जीवनदान महागले!

By admin | Updated: June 21, 2014 00:35 IST

रक्तघटकाच्या दरात घसघसीत वाढ: सर्वसामान्यावर वाढला बोझा.

वाशिम : दात्यांकडून घेतलेले रक्त व त्यामधील घटकांवर प्रक्रिया करून ते सुरक्षितपणे साठविण्याची प्रक्रिया खर्चिक बनल्यामुळे रक्ताचे दर दुप्पटीकडे झेपावले आहेत. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यामध्येच सुधारित दरपत्रक जारी केले होते. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही सुधारित दरपत्रक जारी केले असून त्यामध्ये अवघ्या ८५0 रुपयांना मिळणार्‍या रक्तपिशवीची मूळ किंमत तब्बल १ हजार ४५0 रुपये करण्यात आले आहेत. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! आज रक्ताचे दर वाढल्यामुळे जीवनच महागले, अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून ऐकावयास मिळत आहेत. रक्ताचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेने एक समिती गठित केली. या समितीमध्ये खासगी रक्तपेढी, रेडक्रॉस, शासकीय रक्तपेढी व अन्न व औषधी प्रशासनाच्या प्रतिनिधींसह एकूण १६ सदस्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या पाहणीमध्ये रक्तसंकलनानंतर रक्त व रक्तघटकांवर करावी लागणारी प्रक्रिया अधिक खर्चिक बनल्याचे निदर्शनास आले. तसेच अद्ययावत यंत्रांद्वारे तपासण्या केलेले रक्त रुग्णांना पुरविण्यासाठी रक्तपेढ्यांना न परवाडणार्‍्या दरात वितरित करावे लागत होते. याचा परिणाम रक्ताच्या सुरक्षिततेवरही जाणवत होता. अभ्यास समितीने या बाबी राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर मांडल्यामुळे रक्ताचे दर वाढविण्याचा निर्णय झाला असुन सदर परिपत्रक जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले आहे.