शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

विहिरींची पातळी खालावली, रबी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST

गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा ...

गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊन अनेक शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्चसुध्दा वसूल झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचा आधार घेऊन खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी उंबर्डा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरवून, गहू , हरभरा आदी रबी पिकांची पेरणी केली. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी वारेमाप पाणीउपसा केला. आता ही पिके एकदम जोमात आलेली असताना तापमानात वाढ होत असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऐन गव्हाची ओंबी आणि हरभरा पिकाचे घाटे भरण्याची वेळ आली असताना विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.