शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

विहिरींची पातळी खालावली, रबी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST

गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा ...

गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊन अनेक शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्चसुध्दा वसूल झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचा आधार घेऊन खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी उंबर्डा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरवून, गहू , हरभरा आदी रबी पिकांची पेरणी केली. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी वारेमाप पाणीउपसा केला. आता ही पिके एकदम जोमात आलेली असताना तापमानात वाढ होत असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऐन गव्हाची ओंबी आणि हरभरा पिकाचे घाटे भरण्याची वेळ आली असताना विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.