शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ!

By admin | Updated: May 30, 2017 01:46 IST

थकबाकीत रक्कम वळती होत असल्याचा परिणाम : २९ मे पर्यंत केवळ २३६ कोटींचे कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम म्हटला की जुने कर्ज अदा करायचे आणि नव्याने कर्ज घ्यायचे, अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे; परंतु यंदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पीक कर्ज अदा केले नाही. यासह पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नगण्य आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्ट असताना २९ मेपर्यंत केवळ २३६ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे.गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यापैकी यंदा केवळ २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ६४० कोटी रुपये वसूल करणे बँकांना अशक्य होत असून, शेतकरीही शासनाकडून कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने रक्कम भरण्यास तयार नाहीत. तथापि, थकीत कर्ज भरल्याशिवाय नव्याने कर्ज मंजूर होत नाही, कर्ज मंजूर झाले तरी ती रक्कम जुन्या थकबाकीत वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांनी बँकांच्या पायऱ्याच चढणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली आहे; मात्र खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया अगदी जवळ येऊन ठेपली असताना आणि ३१ मे पर्यंत किमान ८० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असताना कर्ज घेण्यास शेतकरी तयार नसल्याने कर्ज वाटपाची टक्केवारी प्रचंड प्रमाणात घसरली आहे. एकूणच जुनी थकबाकी वसूल होणे कठीण झाले असून, नव्याने कर्ज वाटप प्रक्रियेलाही खीळ बसल्यामुळे भविष्यात पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होणार असल्याची भीती जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू होऊन पेरणीची कामे सुरू होत असल्याने ३१ मे पर्यंत निर्धारित पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी किमान ८० टक्के उद्दिष्ट गाठावे लागते. तशा प्रकारच्या सूचना जिल्ह्यातील संबंधित बँकांना यंदाही देण्यात आल्या आहेत; मात्र गतवर्षीच्या पीक कर्जाची रक्कम न भरण्यासोबतच शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज उचलण्याकडेही पाठ फिरवल्याचे जाणवत आहे. - ज्ञानेश्वर खाडेजिल्हा उपनिबंधक, वाशिम.