शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ!

By admin | Updated: May 30, 2017 01:46 IST

थकबाकीत रक्कम वळती होत असल्याचा परिणाम : २९ मे पर्यंत केवळ २३६ कोटींचे कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम म्हटला की जुने कर्ज अदा करायचे आणि नव्याने कर्ज घ्यायचे, अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे; परंतु यंदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पीक कर्ज अदा केले नाही. यासह पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नगण्य आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्ट असताना २९ मेपर्यंत केवळ २३६ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे.गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यापैकी यंदा केवळ २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ६४० कोटी रुपये वसूल करणे बँकांना अशक्य होत असून, शेतकरीही शासनाकडून कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने रक्कम भरण्यास तयार नाहीत. तथापि, थकीत कर्ज भरल्याशिवाय नव्याने कर्ज मंजूर होत नाही, कर्ज मंजूर झाले तरी ती रक्कम जुन्या थकबाकीत वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांनी बँकांच्या पायऱ्याच चढणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली आहे; मात्र खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया अगदी जवळ येऊन ठेपली असताना आणि ३१ मे पर्यंत किमान ८० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असताना कर्ज घेण्यास शेतकरी तयार नसल्याने कर्ज वाटपाची टक्केवारी प्रचंड प्रमाणात घसरली आहे. एकूणच जुनी थकबाकी वसूल होणे कठीण झाले असून, नव्याने कर्ज वाटप प्रक्रियेलाही खीळ बसल्यामुळे भविष्यात पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होणार असल्याची भीती जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू होऊन पेरणीची कामे सुरू होत असल्याने ३१ मे पर्यंत निर्धारित पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी किमान ८० टक्के उद्दिष्ट गाठावे लागते. तशा प्रकारच्या सूचना जिल्ह्यातील संबंधित बँकांना यंदाही देण्यात आल्या आहेत; मात्र गतवर्षीच्या पीक कर्जाची रक्कम न भरण्यासोबतच शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज उचलण्याकडेही पाठ फिरवल्याचे जाणवत आहे. - ज्ञानेश्वर खाडेजिल्हा उपनिबंधक, वाशिम.