शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

तूर, सोयाबीनच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 13, 2017 01:17 IST

घरच्या बियाण्यांवर भर : मूग, उडिदाची मागणी वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे. मूग आणि उडिदाच्या बियाण्यांची मागणी वाढल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ८७ हजार ४३० हेक्टर, तुरीचे ६३ हजार ५०१ हेक्टर, मुगाचे १२ हजार ६०० हेक्टर, तर उडिदाचे १५ हजार २१७ हेक्टर होते. यंदाही तूर आणि सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असला, तरी त्याचे क्षेत्र घटणार असल्याचे बाजारातील स्थिती आणि कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालावरून स्पष्ट होते. मागील वर्षी सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु या दोन्ही वाणांना अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंतही या वाणांची विक्री केली नाही. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. त्यातच घरीच मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पडून असल्याने या वाणाचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. कृषी सेवा केंद्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. दरम्यान, मागील वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांचे दर कमी झाल्याचे या संदर्भातील माहितीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत बाजारात तुरीच्या बियाण्यांचे भाव ९० रुपये ते १५० रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाण्यांचे भाव ४५ ते ५० रुपये प्रति ेिकलो आहेत. अशात घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना अधिक परवडणारे असल्याचे स्पष्ट होते. मुगाच्या बियाण्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलो, तर उडीदा बियाण्यांचे दर १०० ते १५० रुपये प्रति किलो आहेत. कपाशीच्या बॅगचे दर ७५० रुपये असल्याचे कृषी सेवा केेंद्रधारकांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला वेग दिला असून, मालेगाव, वाशिम, रिसोड तालुक्यात पेरणी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीत यंदा ४ लाख १३ हजार हेक्टवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार असून, यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन, तुरीचे क्षेत्र घटून मूग आणि उडीद या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृषीसेवा केंद्रांच्या माहितीनुसार कृषी विभागाची प्रस्तावित आकडेवारी खरी ठरणार असल्याचे दिसत आहे.कृषी सेवा केंद्रावरील गर्दी वाढली!यंदा शेतमालास अपेक्षित भाव मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या विंवचनेत सापडला होता. शेकडो शेतकऱ्यांनी अद्यापही तूर, सोयाबीनची विक्रीच केली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीबाबत शेतकऱ्यांचा फारसा उत्साह दिसत नव्हता. दरम्यान, शासनाच्या निर्णयापूर्वी बँकेकडून होत असलेला कर्जवसुलीचा तगादाही शेतकऱ्यांची चिंता वाढवित होता. त्यामुळे कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाटच दिसत होता. अशात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा तडाखा सुरु असतानाच शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांत उत्साह संचारला आणि कृषीसेवा केंद्रांवर सोमवारी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.