शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

तूर, सोयाबीनच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: June 13, 2017 01:17 IST

घरच्या बियाण्यांवर भर : मूग, उडिदाची मागणी वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे. मूग आणि उडिदाच्या बियाण्यांची मागणी वाढल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ८७ हजार ४३० हेक्टर, तुरीचे ६३ हजार ५०१ हेक्टर, मुगाचे १२ हजार ६०० हेक्टर, तर उडिदाचे १५ हजार २१७ हेक्टर होते. यंदाही तूर आणि सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असला, तरी त्याचे क्षेत्र घटणार असल्याचे बाजारातील स्थिती आणि कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालावरून स्पष्ट होते. मागील वर्षी सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु या दोन्ही वाणांना अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंतही या वाणांची विक्री केली नाही. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. त्यातच घरीच मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पडून असल्याने या वाणाचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. कृषी सेवा केंद्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. दरम्यान, मागील वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांचे दर कमी झाल्याचे या संदर्भातील माहितीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत बाजारात तुरीच्या बियाण्यांचे भाव ९० रुपये ते १५० रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाण्यांचे भाव ४५ ते ५० रुपये प्रति ेिकलो आहेत. अशात घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना अधिक परवडणारे असल्याचे स्पष्ट होते. मुगाच्या बियाण्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलो, तर उडीदा बियाण्यांचे दर १०० ते १५० रुपये प्रति किलो आहेत. कपाशीच्या बॅगचे दर ७५० रुपये असल्याचे कृषी सेवा केेंद्रधारकांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला वेग दिला असून, मालेगाव, वाशिम, रिसोड तालुक्यात पेरणी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीत यंदा ४ लाख १३ हजार हेक्टवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार असून, यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन, तुरीचे क्षेत्र घटून मूग आणि उडीद या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृषीसेवा केंद्रांच्या माहितीनुसार कृषी विभागाची प्रस्तावित आकडेवारी खरी ठरणार असल्याचे दिसत आहे.कृषी सेवा केंद्रावरील गर्दी वाढली!यंदा शेतमालास अपेक्षित भाव मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या विंवचनेत सापडला होता. शेकडो शेतकऱ्यांनी अद्यापही तूर, सोयाबीनची विक्रीच केली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीबाबत शेतकऱ्यांचा फारसा उत्साह दिसत नव्हता. दरम्यान, शासनाच्या निर्णयापूर्वी बँकेकडून होत असलेला कर्जवसुलीचा तगादाही शेतकऱ्यांची चिंता वाढवित होता. त्यामुळे कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाटच दिसत होता. अशात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा तडाखा सुरु असतानाच शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांत उत्साह संचारला आणि कृषीसेवा केंद्रांवर सोमवारी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.