शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळेच शेतक-यांची शासकीय खरेदीकडे पाठ

By admin | Updated: December 2, 2015 02:40 IST

विविध कागदपत्रांची मागणी : कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त.

वाशिम : नाफेड तसेच सीसीआयच्या जाचक अटींमुळेच शेतकर्‍यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असून, खासगी व्यापार्‍यांकडे वळले आहेत. शासनाने कापसाचे ४१00 रुपये हमीभाव ठरविले असून, सध्या बाजारातही तेच भाव मिळत आहेत; मात्र त्यानंतरही शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडेच वळत आहेत. सध्या कपाशीचे पीक निघाले असून, ग्रामीण भागात कापसाची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात कपाशीची ३0 हजार ८५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यावर्षी अल्प पाऊस झाला असून, उत्पादनात घट आली आहे. शेतकर्‍यांनी एकरी तीन ते पाच क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले आहे. शासनाने यावर्षी कपाशीला ४१00 रुपये हमीभाव दिला आहे. तसेच जिल्ह्यात मानोरा येथे सीसीआय आणि मंगरूळपीर येथे नाफेडच्यावतीने कापसाचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र याकडे शेकर्‍यांनी पाठ फिरविली असून, अत्यल्प प्रमाणात कपाशीची विक्री करण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी व्यापार्‍यांकडे शेतकर्‍यांचा कल आहे. खासगी व्यापारीही ४१00 ते ४१५0 या भावातच कपाशीची खरेदी करीत आहे; मात्र शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करताना शेतकर्‍यांना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो. शासकीय खरेंदी केंद्रांवर कपाशीच्या दर्जानुसार शेतमालाची खरेदी करण्यात येते, अन्यथा शेतकर्‍याला परत पाठविण्यात येते. सध्या कपाशीची काढणी सुरू असून, त्यामध्ये ओलावा आहे. आद्रतेमुळे अनेक शेतकर्‍यांना परत पाठविण्यात येते, तसेच शेतकर्‍यांना त्वरित पैसे देण्यात येत नाहीत. यासोबतच शेतकर्‍यांना शेतमाल खरेदी करताना सातबारा, आधार कार्ड यासह अन्य कागदपत्रे मागण्यात येतात.