शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

जाचक अटींमुळेच शेतक-यांची शासकीय खरेदीकडे पाठ

By admin | Updated: December 2, 2015 02:40 IST

विविध कागदपत्रांची मागणी : कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त.

वाशिम : नाफेड तसेच सीसीआयच्या जाचक अटींमुळेच शेतकर्‍यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असून, खासगी व्यापार्‍यांकडे वळले आहेत. शासनाने कापसाचे ४१00 रुपये हमीभाव ठरविले असून, सध्या बाजारातही तेच भाव मिळत आहेत; मात्र त्यानंतरही शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडेच वळत आहेत. सध्या कपाशीचे पीक निघाले असून, ग्रामीण भागात कापसाची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात कपाशीची ३0 हजार ८५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यावर्षी अल्प पाऊस झाला असून, उत्पादनात घट आली आहे. शेतकर्‍यांनी एकरी तीन ते पाच क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले आहे. शासनाने यावर्षी कपाशीला ४१00 रुपये हमीभाव दिला आहे. तसेच जिल्ह्यात मानोरा येथे सीसीआय आणि मंगरूळपीर येथे नाफेडच्यावतीने कापसाचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र याकडे शेकर्‍यांनी पाठ फिरविली असून, अत्यल्प प्रमाणात कपाशीची विक्री करण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी व्यापार्‍यांकडे शेतकर्‍यांचा कल आहे. खासगी व्यापारीही ४१00 ते ४१५0 या भावातच कपाशीची खरेदी करीत आहे; मात्र शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करताना शेतकर्‍यांना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो. शासकीय खरेंदी केंद्रांवर कपाशीच्या दर्जानुसार शेतमालाची खरेदी करण्यात येते, अन्यथा शेतकर्‍याला परत पाठविण्यात येते. सध्या कपाशीची काढणी सुरू असून, त्यामध्ये ओलावा आहे. आद्रतेमुळे अनेक शेतकर्‍यांना परत पाठविण्यात येते, तसेच शेतकर्‍यांना त्वरित पैसे देण्यात येत नाहीत. यासोबतच शेतकर्‍यांना शेतमाल खरेदी करताना सातबारा, आधार कार्ड यासह अन्य कागदपत्रे मागण्यात येतात.