शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

जाचक अटींमुळेच शेतक-यांची शासकीय खरेदीकडे पाठ

By admin | Updated: December 2, 2015 02:40 IST

विविध कागदपत्रांची मागणी : कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त.

वाशिम : नाफेड तसेच सीसीआयच्या जाचक अटींमुळेच शेतकर्‍यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असून, खासगी व्यापार्‍यांकडे वळले आहेत. शासनाने कापसाचे ४१00 रुपये हमीभाव ठरविले असून, सध्या बाजारातही तेच भाव मिळत आहेत; मात्र त्यानंतरही शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडेच वळत आहेत. सध्या कपाशीचे पीक निघाले असून, ग्रामीण भागात कापसाची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात कपाशीची ३0 हजार ८५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यावर्षी अल्प पाऊस झाला असून, उत्पादनात घट आली आहे. शेतकर्‍यांनी एकरी तीन ते पाच क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले आहे. शासनाने यावर्षी कपाशीला ४१00 रुपये हमीभाव दिला आहे. तसेच जिल्ह्यात मानोरा येथे सीसीआय आणि मंगरूळपीर येथे नाफेडच्यावतीने कापसाचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र याकडे शेकर्‍यांनी पाठ फिरविली असून, अत्यल्प प्रमाणात कपाशीची विक्री करण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी व्यापार्‍यांकडे शेतकर्‍यांचा कल आहे. खासगी व्यापारीही ४१00 ते ४१५0 या भावातच कपाशीची खरेदी करीत आहे; मात्र शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करताना शेतकर्‍यांना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो. शासकीय खरेंदी केंद्रांवर कपाशीच्या दर्जानुसार शेतमालाची खरेदी करण्यात येते, अन्यथा शेतकर्‍याला परत पाठविण्यात येते. सध्या कपाशीची काढणी सुरू असून, त्यामध्ये ओलावा आहे. आद्रतेमुळे अनेक शेतकर्‍यांना परत पाठविण्यात येते, तसेच शेतकर्‍यांना त्वरित पैसे देण्यात येत नाहीत. यासोबतच शेतकर्‍यांना शेतमाल खरेदी करताना सातबारा, आधार कार्ड यासह अन्य कागदपत्रे मागण्यात येतात.