शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

गतवर्षात ८२ शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ ३० कुटुंबांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली ...

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. साहेबराव करपे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अद्यापही शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबू शकले नाही. चालू महिन्यापर्यंत राज्यात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर राज्यात दरदिवशी ४० ते ५० हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वाशिम जिल्ह्याचा विचार करता गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४३० शेतकऱ्यांनी नापिकी, सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यापैकी केवळ २२९ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर तब्बल २०९ प्रकरणे शासनाच्या निकषात न बसल्याने मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. त्यात २०१९ मध्ये ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ४९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४३ प्रकरणे अपात्र ठरली, तसेच गतवर्षी ८२ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकीही केवळ ३० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४२ प्रकरणे अपात्र ठरली असून, १० प्रकरणे चौकशीत आहेत.

--------

१) कारखेडा येथील रोहिदास कोंडबा जाधव (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून ३० ऑगस्ट २०२० रोजी विजेची जिवंत तार हातात घेऊन कारखेडा शिवारातील नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असून, अद्यापही त्यांच्या कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. (18६ँ08)

------------

२) मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील दत्ता रामचंद्र हळदे (६०) यांनी २२ जानेवारी २०२० रोजी घरातील सर्व मंडळी कामासाठी बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वर्ष उलटले. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली. त्यापैकी ३० हजार खर्चासाठी मिळाले, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांनी मिळणार असून, त्यांच्या परिवाराचा जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.

----------

३) कारंजा तालुक्यातील दुघोरा येथे ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंंड या ३६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात विधवा पत्नी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या विधवा पत्नीला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

-----------

२०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ९२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ४९

--------------

२०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ८२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ३०