शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षात ८२ शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ ३० कुटुंबांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली ...

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. साहेबराव करपे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अद्यापही शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबू शकले नाही. चालू महिन्यापर्यंत राज्यात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर राज्यात दरदिवशी ४० ते ५० हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वाशिम जिल्ह्याचा विचार करता गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४३० शेतकऱ्यांनी नापिकी, सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यापैकी केवळ २२९ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर तब्बल २०९ प्रकरणे शासनाच्या निकषात न बसल्याने मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. त्यात २०१९ मध्ये ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ४९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४३ प्रकरणे अपात्र ठरली, तसेच गतवर्षी ८२ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकीही केवळ ३० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४२ प्रकरणे अपात्र ठरली असून, १० प्रकरणे चौकशीत आहेत.

--------

१) कारखेडा येथील रोहिदास कोंडबा जाधव (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून ३० ऑगस्ट २०२० रोजी विजेची जिवंत तार हातात घेऊन कारखेडा शिवारातील नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असून, अद्यापही त्यांच्या कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. (18६ँ08)

------------

२) मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील दत्ता रामचंद्र हळदे (६०) यांनी २२ जानेवारी २०२० रोजी घरातील सर्व मंडळी कामासाठी बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वर्ष उलटले. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली. त्यापैकी ३० हजार खर्चासाठी मिळाले, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांनी मिळणार असून, त्यांच्या परिवाराचा जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.

----------

३) कारंजा तालुक्यातील दुघोरा येथे ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंंड या ३६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात विधवा पत्नी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या विधवा पत्नीला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

-----------

२०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ९२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ४९

--------------

२०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ८२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ३०