शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

गतवर्षात ८२ शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ ३० कुटुंबांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली ...

१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. साहेबराव करपे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अद्यापही शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबू शकले नाही. चालू महिन्यापर्यंत राज्यात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर राज्यात दरदिवशी ४० ते ५० हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वाशिम जिल्ह्याचा विचार करता गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४३० शेतकऱ्यांनी नापिकी, सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यापैकी केवळ २२९ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर तब्बल २०९ प्रकरणे शासनाच्या निकषात न बसल्याने मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. त्यात २०१९ मध्ये ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ४९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४३ प्रकरणे अपात्र ठरली, तसेच गतवर्षी ८२ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकीही केवळ ३० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४२ प्रकरणे अपात्र ठरली असून, १० प्रकरणे चौकशीत आहेत.

--------

१) कारखेडा येथील रोहिदास कोंडबा जाधव (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून ३० ऑगस्ट २०२० रोजी विजेची जिवंत तार हातात घेऊन कारखेडा शिवारातील नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असून, अद्यापही त्यांच्या कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. (18६ँ08)

------------

२) मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील दत्ता रामचंद्र हळदे (६०) यांनी २२ जानेवारी २०२० रोजी घरातील सर्व मंडळी कामासाठी बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वर्ष उलटले. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली. त्यापैकी ३० हजार खर्चासाठी मिळाले, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांनी मिळणार असून, त्यांच्या परिवाराचा जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.

----------

३) कारंजा तालुक्यातील दुघोरा येथे ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंंड या ३६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात विधवा पत्नी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या विधवा पत्नीला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

-----------

२०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ९२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ४९

--------------

२०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ८२

मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ३०