शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

वाशिम : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देऊन आता मुलींनाही लष्करात दाखल होता येणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ...

वाशिम : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देऊन आता मुलींनाही लष्करात दाखल होता येणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यामुळे ‘एनसीसी’मध्ये दाखल मुलींमधून आनंद व्यक्त होत आहे.

सध्या मुली किंवा महिला चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा डेहरादून येथील इंडियन मिल्ट्री अकॅडमी या संस्थांसाठीची प्रवेश परीक्षा देऊन लष्करात दाखल होतात; मात्र मुली, महिलांनी ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करात दाखल होण्याची तरतूद नव्हती. याविरोधात ॲड. कुश कार्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर १८ ऑगस्ट रोजी न्या. संजय किशन कौल आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने निर्णय देत मुलींना ‘एनडीए’ची परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे येत्या ५ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ‘एनडीए’च्या परीक्षेत मुलीही सहभागी होऊ शकणार आहेत.

...........................

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

सुप्रीम कोर्टाने १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार आता मुलींनाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा येत्या ५ सप्टेंबरला होणार आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला होणार असून निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि जाहिरात करण्याचा आदेश कोर्टाने ‘यूपीएससी’ला दिला आहे.

.......................

लष्करात प्रवेशासाठी...

एनडीए’, ‘आयएमए’ आणि ‘ओटीए’ या तीन माध्यमांद्वारे लष्करात प्रवेश करता येतो. त्यातील ‘आयएमए’ आणि ‘ओटीए’च्या माध्यमातून मुलींना लष्करात प्रवेश मिळतो; मात्र ‘एनडीए’तून मुलींना प्रवेश दिला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हा प्रश्नही आता निकाली निघाला आहे.

...............

दोन शहरात एनसीसीच्या ३० मुली

जिल्ह्यातील वाशिम शहरात असलेल्या श्री बाकलीवाल विद्यालयात १५ आणि मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेत १५ अशा एकूण ३० मुली सध्या एनसीसीमध्ये दाखल आहेत. त्यातील इच्छुक मुलींना आता ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करात दाखल होता येणार आहे.

................

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !

लष्करात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच बाळगले आहे. त्यामुळेच एनसीसीमध्ये दाखल झाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ‘एनडीए’ची परीक्षा देता येणार असल्याने आनंद झाला आहे.

- श्रुती शिंदे

..........

आतापर्यंत मुलांनाच ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करामध्ये दाखल होता येत होते. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हा अधिकार आता मुलींनाही बहाल केला. त्यामुळे कोर्टाचे मन:पूर्वक आभार !

- सायली कांबळे

..........

शालेय जीवनात ‘एनसीसी’चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला लष्करातच दाखल व्हायचे आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न आपण बाळगले आहे. सुप्रीम काेर्टाच्या निर्णयाने मोठा आनंद झाला.

- भारती देशमुख