शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाशिम जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 21, 2014 00:31 IST

विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

वाशिम: जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. संबधितांनी याक डे लक्ष देऊन त्वरीत साफसफाई करावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. वाशिमला जिल्हय़ाचा दर्जा प्राप्त झाला खरा; परंतु विकासाच्या बाबतीत अतिशय मागे राहिल्यामुळे राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून वाशिमचे नाव घेतले जाऊ लागले. जिल्हय़ात आवश्यक असलेली काही मुख्यालये येथे तयार करण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचाही समावेश आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक अनेक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. काही दिवस येथे बर्‍यापैकी कारभार चालला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात अव्यवस्थेने क ळस गाठला आहे. मुबलक प्रमाणात औषधी पुरवठा, वैद्यकीय, अधिकारी, कर्मचार्‍यांची परेशी संख्या असतानाही रुग्णांवर काळजीने उपचार केले जात नाहीत. येथे येणार्‍या रुग्णांवर थातूरमातूर उपचार करून त्याला लगेचच अकोला येथे हलविण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे 'रेफर टू अकोला' या नावानेच जिल्हा रूग्णालय ओळखले जाऊ लागले. या रुग्णालयाच्या आवारासह आतमध्येही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रसाधनगृहांची अनेक दिवसांपासून साफ सफाई झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे.परिसरात सर्वत्र गाजर गवत वाढल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, या डासांमुळे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनाही आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चांगल्या प्रकारचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रेमळ स्वभावानेच रुग्णांचा अर्धा आजार बरा करतात; परंतु वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात नाही. या रुग्णालयातील अव्यवस्थेविषयी अनेक वेळा चर्चा झाली; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. संबंधित अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालयात साफसफाई अभियान राबवावे आणि रूग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, देवराज राठोड, प्रा. अनिल चव्हाण, तालुकाध्यक्ष किशोर राठोड, उपतालुकाध्यक्ष लोकेश चव्हाण, शांताराम पवार, गोपीचंद चव्हाण, संजिव जाधव, जीवन राठोड, विनोद राठोड, अशोक चव्हाण, मोहन महाराज आदिंची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविण्यात आली आहे.