शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल धनादेशाचा लोचा

By admin | Updated: November 19, 2016 02:27 IST

मध्यवर्ती बँकेत सर्वाधिक शेतकर्‍यांचे खाते असल्याने शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाशिम, दि. १८- ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर, नोटांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. बाजार समिती किंवा नाफेडमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर धनादेशद्वारे प्राप्त होणारी रक्कम मध्यवर्ती बँकेतून कधी मिळेल, या शंकेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १000 रुपयांची नोट रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चलनातून बाद ठरलेल्या नोटा बदलविण्यासाठी नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागत आहेत. चलनातील नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. या तुटवड्यामुळे मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवाव्या लागल्या. शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार धनादेशद्वारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी केल्यानंतर बाजार समित्या पूर्ववत झाल्या तसेच नाफेडद्वारे शेतमाल खरेदी सुरू झाली. शेतमाल विक्रीनंतर धनादेशाद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकर्‍यांकडे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही व्यवहारावर काही निर्बंध आणले. मध्यवर्ती बँकेला जून्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. मध्यवर्ती बँकेकडे पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतमाल विक्री केल्यानंतर मध्यवर्ती बँकेतून वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर, या शंकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार असलेल्या शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत व अर्बन बँकेचे खातेदार असलेले शेतकरी मात्र शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे; मात्र अशा शेतकर्‍यांची संख्या अल्प असल्याने बाजार समित्यांमधील आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे.