शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

शेतमाल धनादेशाचा लोचा

By admin | Updated: November 19, 2016 02:27 IST

मध्यवर्ती बँकेत सर्वाधिक शेतकर्‍यांचे खाते असल्याने शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाशिम, दि. १८- ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर, नोटांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. बाजार समिती किंवा नाफेडमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर धनादेशद्वारे प्राप्त होणारी रक्कम मध्यवर्ती बँकेतून कधी मिळेल, या शंकेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १000 रुपयांची नोट रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चलनातून बाद ठरलेल्या नोटा बदलविण्यासाठी नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागत आहेत. चलनातील नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. या तुटवड्यामुळे मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवाव्या लागल्या. शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार धनादेशद्वारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी केल्यानंतर बाजार समित्या पूर्ववत झाल्या तसेच नाफेडद्वारे शेतमाल खरेदी सुरू झाली. शेतमाल विक्रीनंतर धनादेशाद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकर्‍यांकडे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही व्यवहारावर काही निर्बंध आणले. मध्यवर्ती बँकेला जून्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. मध्यवर्ती बँकेकडे पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतमाल विक्री केल्यानंतर मध्यवर्ती बँकेतून वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर, या शंकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार असलेल्या शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत व अर्बन बँकेचे खातेदार असलेले शेतकरी मात्र शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे; मात्र अशा शेतकर्‍यांची संख्या अल्प असल्याने बाजार समित्यांमधील आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे.