शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

पावसाअभावी खरीप पिके संकटात!

By admin | Updated: July 11, 2017 01:52 IST

आसेगावातील चित्र : सोयाबीन पडले पिवळे

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे: यंदा सुरुवातीच्या पावसानंतर आसेगाव परिसरात जवळपास ९० टक्क्याहून अधिक पेरणी पूर्ण झाली; परंतु आता दोन आठवड्याहून अधिक काळापासून पावसाचा पत्ताच नसल्याने खरिपातील सर्वच पिके संकटात सापडली असून, सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रापूर्वीच २८ मे रोजी आसेगाव परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे लोकांना उन्हाळ्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आणि शेतकऱ्यांनीही मशागतीला वेग दिला. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधूनमधून बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही वेग दिला आणि जूनच्या पंधरवड्यातच परिसरातील ९० टक्के पेरणी आटोपली. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात खरिपाची पिके उगवून डोलू लागली; परंतु आता मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे १० जूननंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परिसरात ८० टक्के शेतकरी पावसावरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची पिके सुकत चालली आहेत. तर उर्वरित २० टक्के शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पाणी तुषार सिंचनाच्या आधारे वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कृषी विभागातील जानकारांच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली, तर पिके हिरवी होऊन त्यांची जोमदार वाढ होईल; परंतु पावसाने आठवडा भरात हजेरी लावली नाही, तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असून, अनेक ठिकाणी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून, त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आसेगाव परिसरात ७० टक्क्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, हे पीक पावसाअभावी पिवळे पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.