शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पावसाअभावी खरीप पिके संकटात!

By admin | Updated: July 11, 2017 01:52 IST

आसेगावातील चित्र : सोयाबीन पडले पिवळे

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे: यंदा सुरुवातीच्या पावसानंतर आसेगाव परिसरात जवळपास ९० टक्क्याहून अधिक पेरणी पूर्ण झाली; परंतु आता दोन आठवड्याहून अधिक काळापासून पावसाचा पत्ताच नसल्याने खरिपातील सर्वच पिके संकटात सापडली असून, सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रापूर्वीच २८ मे रोजी आसेगाव परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे लोकांना उन्हाळ्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आणि शेतकऱ्यांनीही मशागतीला वेग दिला. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधूनमधून बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही वेग दिला आणि जूनच्या पंधरवड्यातच परिसरातील ९० टक्के पेरणी आटोपली. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात खरिपाची पिके उगवून डोलू लागली; परंतु आता मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे १० जूननंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परिसरात ८० टक्के शेतकरी पावसावरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची पिके सुकत चालली आहेत. तर उर्वरित २० टक्के शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पाणी तुषार सिंचनाच्या आधारे वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कृषी विभागातील जानकारांच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली, तर पिके हिरवी होऊन त्यांची जोमदार वाढ होईल; परंतु पावसाने आठवडा भरात हजेरी लावली नाही, तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असून, अनेक ठिकाणी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून, त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आसेगाव परिसरात ७० टक्क्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, हे पीक पावसाअभावी पिवळे पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.