शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कर्जमाफीमुळे शेतक-यांना दिलासा - तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:43 IST

कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले.

ठळक मुद्दे शेतक-यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज भरण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतक-यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकºयांचे आॅनलाइन व आॅफलाइन अर्जासह आधार क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज भरण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या बँकेतून शेतकºयाने कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेत आॅफलाइन स्वरूपातील अर्ज स्वीकारले जात आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज प्रक्रिया ठेवल्यामुळे प्रामाणिक शेतकºयांचा या योजनेचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत त्यांनी माहिती दिली तसेच शेतकºयांचे आत्महत्यांचे प्रमाणही कमी होत आहे. कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी तूर खरेदी, खरीप हंगामासाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत, पीक कर्ज वितरण याविषयी माहिती दिली.