शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीमुळे शेतक-यांना दिलासा - तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:43 IST

कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले.

ठळक मुद्दे शेतक-यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज भरण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतक-यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकºयांचे आॅनलाइन व आॅफलाइन अर्जासह आधार क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज भरण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या बँकेतून शेतकºयाने कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेत आॅफलाइन स्वरूपातील अर्ज स्वीकारले जात आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज प्रक्रिया ठेवल्यामुळे प्रामाणिक शेतकºयांचा या योजनेचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत त्यांनी माहिती दिली तसेच शेतकºयांचे आत्महत्यांचे प्रमाणही कमी होत आहे. कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी तूर खरेदी, खरीप हंगामासाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत, पीक कर्ज वितरण याविषयी माहिती दिली.