शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

काजळेश्वरची कलिंगडे कोलकात्याच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ ...

काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत टरबूज पिकाची लागवड केली. त्यांनी १२,५०० रोपांची लागवड केली होती. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या दोन मुलांनी योग्य व्यवस्थापन केल्याने अवघ्या ७० दिवसांत त्यांना दीड एकरातून ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. टरबुजाचा दर्जा आणि आकार चांगला असल्याने कोलकात्याच्या व्यापाऱ्यांकडून या टरबुजाला मागणी आली. त्यांच्याकडून चांगला दरही मिळाल्याने डिगांबर उपाध्ये यांनी कोलकात्याच्या व्यापाऱ्यांना ही टरबुजे विकली. यातून त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले, तर एक लाख रुपये खर्च वजा जाता दोन लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.

--------

कोट: ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार दीड एकरात यंदा टरबुजाची शेती केली. त्यात यश आले. माझ्या दोन्ही मुलांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात परिश्रम घेत पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. पारंपरिक शेतीसोबत बागायती, फळशेतीचा आधार घेतल्यास शेतकरी समृद्ध होऊ शकतो.

- डिगांबर उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

------------

कोट : ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत काजळेश्वरचे प्रगतिशील शेतकरी डिगांबर उपाध्ये यांनी त्यांच्याकडील शेतजमिनीपैकी दीड एकरावर टरबुजाची लागवड केली. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. ही टरबुजे कोलकात्याच्या बाजारात विकल्याने त्यांना निव्वळ दोन लाख रुपये नफाही झाला.

-संतोष वाळके,

तालुका कृषी अधिकारी, कारंजा