शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाती कुटुंब जोडा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:47 IST

मंगरुळपीर ----आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे, तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध ...

मंगरुळपीर ----आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे, तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध जगावर तापमान वाढीचे संकट ओढवले आहे. घर, कुटुंब, पर्यावरण माणसाचे अस्तित्व जोपासतात, पण कृतघ्न माणूस हे सारे विसरत गेला आहे. या अनुषंगाने येथील पर्यावरणाच्या कृतिशील कार्यकर्त्या व अभ्यासक मृन्मयी सुभाष हातोलकर यांनी ‘नाती कुटुंब जोडा पर्यावरणाचा ऱ्हास टाळा’ असे युवा पिढीच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या भावनेला हात घालून कृतीप्रवण बनविणारे अभिनव अभियान ११ जुलैपासून सुरू केले आहे.

मृन्मयी यांनी सर्वप्रथम कल्पनानगर, नामदेवनगर, सहकार वसाहत या परिसरात वृक्ष संगोपनाच्या अटीवर नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार रस्त्यावर दुतर्फा कडूनिंब, वड, जांभूळ, पिपळ, करंजी, बेल, रिठा, बांबू, आवळा, चिंच,आदी वृक्षांचे घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रोपण करून घेतले. यात अनेक आजी-आजोबांनी सहभाग घेतला होता. याशिवाय आजी-आजोबांचे नाते पर्यावरणाच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आप्तेष्ट व मित्र परिवार यांच्यापैकी २५ शेतमालकांच्या शेतावर जाऊन त्यांच्या कुटुंबांतील आजी- आजोबाच्या हस्ते, मुले व नातू यांच्या उपस्थितीत प्रत्येक शेतात ५ आब्यांच्या मातृवृक्षाचे रोपण करण्यात आले. अनेक आजी-आजोबांच्या डोळ्यात यावेळी अश्रू तराळले. सर्व कुटुंब नवी-जुनी पिढी पर्यावरण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी झुणका भाकरीचे स्वादिष्ट भोजन दिल्याने या उपक्रमाला भावस्पर्शी कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप आले. मृन्मयी हातोलकरांना या उपक्रमासाठी पर्यावरण मित्र मंडळाचे सतीश बंनोरे, शरद येवले, राजेश दबडे, संजय तेलंग, साहिल अबिल्डिंगे, अभिजित हातोलकर, सम्यक बनसोड, राजेंद्र जाधव, ईश्वर परंडे, मनीष राजूरकर, राजेंद्र धोपे, दिलीप पाटील, आण्णा साहेब पांनबिहाडे, आदींचे सहकार्य लाभले.