शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मजूरांच्या ‘जॉब कार्ड’बाबत लवकरच घेतला जाणार आढावा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:24 IST

 वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब कार्डसंदर्भात आढावा घेऊन ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड न ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या जाणार ...

ठळक मुद्देरोजगार हमी योजना : जिल्हा प्रशासनाचे नियोजन

 

वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब कार्डसंदर्भात आढावा घेऊन ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड न ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या जाणार आहेत. 

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार मिळण्यासाठी मजूरांना नोंदणी करावी लागते. नोंदणीकृत मजूरांना जॉब कार्ड मिळाल्यानुसार, त्यानुसार काम उपलब्ध करून दिले जाते. किती दिवस काम केले, मजूरी किती यासह अन्य माहिती जॉब कार्डवर ठेवून या योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शासनातर्फ करण्यात आला. मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही मजुरांकडे ठेवण्याबाबतची तरतुददेखील करण्यात आलेली आहे. असे असतानादेखील ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड ठेवण्याचे प्रकार समोर येत असल्याने आता शासनाने प्रशासनाला यासंदर्भात सक्त सूचना देत तपासणी करण्याचे फर्मान सोडले आहे.

मजुरांना देण्यात आलेली जॉब  कार्ड ग्राम पंचायत कार्यालयास ठेवल्यास त्यामध्ये बºयाच अडचणी निर्माण होवू शकतात तसेच मजुरांना त्यांनी किती दिवस काम केले व किती मजुरी मिळाली याबाबतची माहिती मिळू शकत नाही. या पृष्ठभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड राहू नये, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळाल्या आहेत. या सूचनाच्या अनुषंगाने जिल्हयाचा आढावा घेउन या कार्यक्रमाअंतर्गत मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही ग्राम पंचायत कार्यालयात ठेवली असल्यास ती संबंधित मजुरांकडे तात्काळ देण्यात यावी तसेच यापुढे ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही मजुराचे जॉबकार्ड राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या जाणार आहेत.